Mumbai Weather: मुंबईतील हवामानात मोठे बदल, कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
कोकण परिसरात काल रात्रभर रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत होता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. आज 19 जुलै 2025 रोजी हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागांत ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. पावसाची विश्रांती असली तरी दमट हवामानामुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवत आहे.
advertisement
मुंबई शहरात आज सकाळपासून गडद ढग दाटलेले आहेत. काही भागांत रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. काल संध्याकाळी सायन, दादर, आणि चेंबूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. आज दिवसभर हलक्या सरींची शक्यता असून, वातावरण दमट आणि उष्ण राहणार आहे. हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे नागरिकांनी शरीराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. वाशी, ऐरोली, ठाणे स्टेशन परिसरात सखल भागांत पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून रिमझिम पावसाची शक्यता आहे. तापमानात वाढ झाली असून उकाडा अधिक जाणवत आहे. दिवसभर दाट ढगांची उपस्थिती आणि काही वेळा हलक्या पावसाच्या सरींचा अनुभव मिळू शकतो.
advertisement
पालघर जिल्ह्यात काल दुपारी काही भागांत जोरदार पावसाचा अनुभव आला. आज सकाळपासून मात्र हवामान स्थिर आहे. आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापलेले असून, मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दमट हवामानामुळे दुपारनंतर उष्णता वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी छत्री आणि पाणी सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
कोकण परिसरात काल रात्रभर रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत होता. सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टी भागांत समुद्र थोडा खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.