Mumbai Weather Today : पाऊस थांबला; पारा चढला! मुंबईसह कोकणाला हवामान विभागाचा नवा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या कोकणात ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाली असून वातावरण कोरडे आणि उकाड्याने भरलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, मात्र आता पावसाला पूर्णविराम मिळाला असून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या कोकणात ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाली असून वातावरण कोरडे आणि उकाड्याने भरलेले आहे.
advertisement
मुंबई आणि नवी मुंबईत आज हवामान पूर्णपणे कोरडे आहे. सकाळपासूनच उन वाढले असून दिवसभर वातावरण गरम आणि दमट राहणार आहे. दुपारच्या सुमारास तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये हलकी झुळूक वाहत असली तरी उकाड्यापासून फारसा दिलासा मिळणार नाही.
advertisement
ठाण्यात आज सकाळपासूनच उन कडक आहे. तापमान वाढल्यामुळे वातावरण दमट झालं आहे आणि नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवतो आहे. काही ठिकाणी सकाळी हलका धूर आणि दमट हवेमुळे दृष्यमानता किंचित कमी झाली होती. दुपारपर्यंत तापमान 35 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
advertisement
पालघर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज येथे वातावरण पूर्णपणे कोरडे असून सूर्यप्रकाश तीव्र आहे. ग्रामीण भागात आणि सागरी किनारपट्टीवर गरम वारे वाहत आहेत. उष्म्याचा पारा वाढत असून नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास होत आहे.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान स्थिर आहे. समुद्राच्या ओलाव्यामुळे थोडासा गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी उकाड्याची लाट जाणवेल. तापमान 32 ते 34 अंशांच्या दरम्यान राहणार असून आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने वातावरण कोरडे आणि गरम झाले आहे.