Coconut Rituales : हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत? परंपरा की अंधश्रद्धा, काय आहे कारण?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का की असं का? महिला नारळ का फोडत नाहीत, यामागे नक्की काय कारण आहे?
कोणत्याही पूजा-अर्चनेत किंवा शुभकार्यात नारळ देवाला अर्पण केला जातो. नवीन कामाची सुरुवात करताना किंवा कोणतेही शुभ संकल्प करताना नारळ फोडले जाते. भारतात तर अनेक जेवणाच्या पदार्थांमध्ये नारळ टाकला जातो. पण या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की प्रसंग काहीही असोत, पण भारतीय महिला या नारळ फोडत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
हिंदू धर्मात नारळाला 'श्रीफळ' म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ 'देवाचे फळ' असा होतो. नारळ फोडणे हे 'अहंकार नष्ट करणे' आणि 'स्वत:ला ईश्वरासमोर समर्पित करणे' याचं प्रतीक मानलं जातं. नारळाचं कठीण कवच हे मानवी अहंकार आणि बाह्य जगाचे प्रतिनिधित्व करतं, तर त्यातील शुभ्र, पवित्र पाणी आणि खोबरं हे शुद्ध आत्मा किंवा बुद्धीचं प्रतीक आहे.
advertisement
advertisement
हिंदू धर्मात नारळाला 'बीज' (Seed) किंवा उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या आतला भाग, विशेषतः खोबरं, प्रजनन क्षमता (Fertility) दर्शवतो. महिलांना साक्षात 'सृजनशक्ती' (Procreation Power) म्हणून पाहिलं जातं. एका मान्यतेनुसार, बीज स्वरूपातील नारळ फोडणे हे सृजनशक्तीला नष्ट करण्यासारखे आहे, म्हणूनच महिला नारळ फोडणे टाळतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आजच्या आधुनिक काळात, अनेक भागांमध्ये महिलांना नारळ फोडण्यावर कोणताही आडकाठी राहिलेली नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून, आता अनेक ठिकाणी महिला मोठ्या आत्मविश्वासाने आणि भक्तीभावाने पूजा-विधीमध्ये नारळ फोडताना दिसतात. मात्र, आजही अनेक पारंपरिक मंदिरांमध्ये आणि कुटुंबांमध्ये जुनी रूढी पाळली जाते.


