UPSC success story: दूध विक्रेत्याची मुलगी बनली IAS अधिकारी! ‘पहाडी बेटी’ अनुधारा पाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Last Updated:
UPSC success story: अनुराधा पाल यांनी हरिद्वारमधून शिक्षण घेत UPSC मध्ये ६२ वी रँक मिळवून आयएएस बनण्याचा मान मिळवला. त्यांची संघर्षमय वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणा आहे.
1/8
आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकून उदर्निवाह करायचे, वडिलांचे आपर कष्ट पाहून अनुराधा पाल लहानपणीच मनात एक निर्धार केला. शिकून खूप मोठं व्हायचं, ही परिस्थिती आपण बदलायची. आज त्यांची पहाडी बेटी म्हणून ओळख आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकून उदर्निवाह करायचे, वडिलांचे आपर कष्ट पाहून अनुराधा पाल लहानपणीच मनात एक निर्धार केला. शिकून खूप मोठं व्हायचं, ही परिस्थिती आपण बदलायची. आज त्यांची पहाडी बेटी म्हणून ओळख आहे.
advertisement
2/8
 घरी परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, उच्च शिक्षणासाठी पैसे जमवणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. त्यांचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दुधाचा व्यवसाय करायचे.अनुराधा यांना हे पक्के माहीत होते की, मेहनत आणि योग्य दिशा यांची सांगड घातली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याच दृढनिश्चयामुळे त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
घरी परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, उच्च शिक्षणासाठी पैसे जमवणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. त्यांचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दुधाचा व्यवसाय करायचे.अनुराधा यांना हे पक्के माहीत होते की, मेहनत आणि योग्य दिशा यांची सांगड घातली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याच दृढनिश्चयामुळे त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
advertisement
3/8
दोन वेळा परीक्षा उत्तीर्ण होत ६२ वी रँक मिळवून आयएएस  बनण्याचा मान मिळवला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, इच्छाशक्ती मजबूत असेल तर ध्येय गाठता येते, हे अनुराधा यांनी सिद्ध करून दाखवलं.मूळच्या उत्तराखंडमधील हरिद्वारच्या असलेल्या अनुराधा पाल यांचा जन्म एका अगदी सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
दोन वेळा परीक्षा उत्तीर्ण होत ६२ वी रँक मिळवून आयएएस बनण्याचा मान मिळवला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, इच्छाशक्ती मजबूत असेल तर ध्येय गाठता येते, हे अनुराधा यांनी सिद्ध करून दाखवलं.मूळच्या उत्तराखंडमधील हरिद्वारच्या असलेल्या अनुराधा पाल यांचा जन्म एका अगदी सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
4/8
घरची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने, शिक्षणासाठी त्यांनी हरिद्वारमधील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. अनुराधा यांना गुणवत्ता आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने, त्यांनी आपल्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही.
घरची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने, शिक्षणासाठी त्यांनी हरिद्वारमधील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. अनुराधा यांना गुणवत्ता आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने, त्यांनी आपल्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही.
advertisement
5/8
शालेय शिक्षणानंतर अनुराधा यांनी जीबी पंत विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी लगेच एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. पण काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांना जाणवले की त्यांचे खरे ध्येय हे यूपीएससी आहे. त्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली.
शालेय शिक्षणानंतर अनुराधा यांनी जीबी पंत विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी लगेच एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. पण काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांना जाणवले की त्यांचे खरे ध्येय हे यूपीएससी आहे. त्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली.
advertisement
6/8
दरम्यान, त्यांनी रुडकी येथील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या कोचिंगचा खर्च भागवता येईल. कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांचे ट्युशन्स घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपल्या कोचिंगची फी भरली. त्यांच्या या त्याग आणि मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.
दरम्यान, त्यांनी रुडकी येथील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या कोचिंगचा खर्च भागवता येईल. कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांचे ट्युशन्स घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपल्या कोचिंगची फी भरली. त्यांच्या या त्याग आणि मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.
advertisement
7/8
२०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही केली. मात्र, त्यांचा एकूण स्कोर थोडा कमी असल्याने त्यांनी समाधान न मानता तयारी सुरूच ठेवली. अधिक तयारीसाठी त्या दिल्लीत गेल्या आणि तेथे एका नामांकित यूपीएससी ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागल्या. २०१५ साली दिलेल्या आपल्या दुसऱ्या प्रयत्नात अनुराधा यांनी ६२ वी रँक मिळवत आपले ध्येय साधले आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
२०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही केली. मात्र, त्यांचा एकूण स्कोर थोडा कमी असल्याने त्यांनी समाधान न मानता तयारी सुरूच ठेवली. अधिक तयारीसाठी त्या दिल्लीत गेल्या आणि तेथे एका नामांकित यूपीएससी ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागल्या. २०१५ साली दिलेल्या आपल्या दुसऱ्या प्रयत्नात अनुराधा यांनी ६२ वी रँक मिळवत आपले ध्येय साधले आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
advertisement
8/8
आपल्या अथक मेहनत, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे मोठे यश संपादन केले. त्यांनी आयएएस  बनून आपल्या वडिलांच्या कष्टाचं खरं चीज केलं. गरिबी आणि अडचणींवर मात करून मिळवलेले त्यांचे हे यश आज अशा अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे,
आपल्या अथक मेहनत, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे मोठे यश संपादन केले. त्यांनी आयएएस बनून आपल्या वडिलांच्या कष्टाचं खरं चीज केलं. गरिबी आणि अडचणींवर मात करून मिळवलेले त्यांचे हे यश आज अशा अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे,
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement