मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी अडवली कार; आत 2 महिला अन् सोबत पुरुष, दरवाजा उघडताच बसला धक्का

Last Updated:

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आकुर्डी परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन आलिशान कार अडवल्या. कारचा दरवाजा उघडताच आतमध्ये...

कारमधून चाललेली गांजाची तस्करी (AI Image)
कारमधून चाललेली गांजाची तस्करी (AI Image)
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ४२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आकुर्डी परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आलिशान कारमधून चाललेली गांजाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा हस्तगत केला असून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
ओरिसा कनेक्शन उघड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्करीचे धागेदोरे थेट ओरिसा राज्याशी जुळले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा अमली पदार्थांचा साठा ओरिसा येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आकुर्डी येथील महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी दोन कारमध्ये गांजाची पोती, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मोबाईल संच आढळून आले.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी नूरमोहमद शिराजउद्दीन शेख (वय २९, रा. चिखली), मोहियोद्दीन लियाकत कुरेशी (वय ३०, रा. चिंचवड), आयेशा नूरमोहमद शेख आणि आणखी एका संशयित महिलेला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कुमार, विशाल आणि रुपेश मुळूक यांच्या विरोधातही निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
अमली पदार्थ विरोधी पथकाने ४२ लाखांचा गांजा, कार आणि इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात अमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या मोठ्या टोळीचा हा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी अडवली कार; आत 2 महिला अन् सोबत पुरुष, दरवाजा उघडताच बसला धक्का
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement