Garuda Purana: पुढच्या जन्मात आपण कोण असेल? गरुड पुराणात सांगितलंय ते ओळखण्याचं रहस्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Garuda Purana: गरुड पुराण जन्म, मृत्यू, स्वर्ग, कर्मांची शिक्षा आणि पुढील जन्माशी संबंधित अनेक रहस्ये सांगते. आपण अनेकदा पुनर्जन्माबद्दल ऐकतो. मृत्यूनंतर आत्म्याला पुढील जन्म कोणता मिळेल याबद्दल मनात अनेक प्रश्न असतात. गरुड पुराणात याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
मुंबई : हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक असलेले गरुड पुराण वैष्णव पंथासाठी खूप महत्त्वाचे आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि पक्ष्यांचा राजा गरुड यांच्यातील संवाद सांगितला आहे. गरुड पुराण जन्म, मृत्यू, स्वर्ग, कर्मांची शिक्षा आणि पुढील जन्माशी संबंधित अनेक रहस्ये सांगते. आपण अनेकदा पुनर्जन्माबद्दल ऐकतो. मृत्यूनंतर आत्म्याला पुढील जन्म कोणता मिळेल याबद्दल मनात अनेक प्रश्न असतात. गरुड पुराणात याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
योनी आणि पुढील जन्माची अवस्था - गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या पुढील जन्माची प्रजाती आणि स्थिती पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कर्मांवर अवलंबून असते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याचे रहस्य याच आयुष्यात मिळू शकते. तुम्ही या जीवनात कोणती कर्मे केली आहेत हे लक्षात ठेवावे. गरुड पुराणानुसार पुढील जन्माशी संबंधित रहस्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
आपला पुढचा जन्म काय असेल -
गरुड पुराणानुसार, जे लोक आपल्या आई-वडिलांना किंवा मुलांना दुःख देतात त्यांना पुढील जन्मात पृथ्वीवर जन्म मिळत नाही. ते जन्मापूर्वीच म्हणजे गर्भाशयातच मरतात.
जे लोक महिलांचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात भयंकर आजार होतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य शारीरिक वेदनांमध्ये जाते.
advertisement
ज्या पुरुषांचे दुसऱ्या स्त्रीशी अवैध संबंध असतात ते त्यांच्या पुढच्या जन्मात नपुंसक होतात. जे लोक आपल्या गुरूंचा आदर करत नाहीत, ते मृत्यूनंतर नरकात जातात. पाण्याशिवाय मनुष्याला त्याचा पुढचा जन्म ब्रह्मराक्षस म्हणून मिळतो.
गरुण पुराणानुसार, जे लोक त्यांच्या आयुष्यात इतरांची फसवणूक करतात ते पुढच्या जन्मी घुबडाच्या रूपात जन्माला येतात. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या निर्दोष व्यक्तीविरुद्ध खोटा आळ घेतला तर तो त्याच्या पुढच्या जन्मात आंधळा जन्मतो.
advertisement
गरुण पुराणानुसार, जे लोक आपल्या उपजीविकेसाठी लोकांना मारतात, लुटारू असतात आणि प्राण्यांची शिकार करतात, ते पुढच्या जन्मात कसायाकडून मारल्या जाणाऱ्या बकरीच्या रूपात जन्माला येतात. जो व्यक्ती स्त्रीचा खून करतो किंवा गर्भपात करतो त्याला नरक भोगावे लागते. यानंतर त्या व्यक्तीचा पुढचा जन्म चांडाळ म्हणून होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Garuda Purana: पुढच्या जन्मात आपण कोण असेल? गरुड पुराणात सांगितलंय ते ओळखण्याचं रहस्य