आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहण,या काळात काय करावं काय टाळावं? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Chandra Grahan 2026 : फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला यंदा वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण अनुभवायला मिळणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी होणारे हे चंद्रग्रहण तब्बल ३ तास २७ मिनिटे चालणार असून भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे.
मुंबई : फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला यंदा वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण अनुभवायला मिळणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी होणारे हे चंद्रग्रहण तब्बल ३ तास २७ मिनिटे चालणार असून भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक परंपरेनुसार सूतक काळ पाळला जाणार आहे. यापूर्वी अमावस्येला झालेले सूर्यग्रहण भारतात न दिसल्याने त्याचा सूतक विचार करण्यात आला नव्हता. मात्र आता येणाऱ्या चंद्रग्रहणामुळे श्रद्धाळूंत विशेष उत्सुकता आहे.
खगोलशास्त्रीय घटना आणि धार्मिक मान्यता
खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्रग्रहण तेव्हा घडते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने चंद्रग्रहणामुळे कोणताही थेट शारीरिक धोका नसतो.
मात्र धार्मिक परंपरेत ग्रहणकाळाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार ग्रहण हा सूतक मानला जाणारा कालखंड आहे. या काळात काही गोष्टी टाळाव्यात आणि काही विशिष्ट आचार पाळावेत, अशी परंपरा आहे.
advertisement
सूतक काळ कधी सुरू होणार?
३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरुवात होईल आणि सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी ते संपेल. परंपरेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधी सुरू होतो. त्यामुळे सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून सूतक लागू होईल. ग्रहण समाप्तीनंतर सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी सूतक संपुष्टात येईल.
advertisement
काय करावे?
ग्रहण सुरू होण्यापूर्वी घराची स्वच्छता करणे आणि अन्नपदार्थ झाकून ठेवणे शुभ मानले जाते. सूतक सुरू होण्यापूर्वी शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने टाकावीत, अशी परंपरा आहे. ग्रहणकाळात मंत्रजप, ध्यान, प्रार्थना, स्तोत्रपठण करणे योग्य मानले जाते. अनेकजण या काळात देवतांचे स्मरण करून मानसिक शांती साधण्याचा प्रयत्न करतात.
ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे, घरात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडणे आणि स्वच्छता राखणे श्रेयस्कर मानले जाते. काही कुटुंबांमध्ये उरलेले अन्न त्यागण्याची प्रथा आहे. तसेच दानधर्म करणे, गरजूंना मदत करणे आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे पुण्यकारक समजले जाते.
advertisement
काय टाळावे?
सूतक काळात नवीन अन्न शिजवू नये किंवा सेवन करू नये, अशी परंपरा आहे. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी ग्रहणकाळात घराबाहेर जाणे टाळावे, असे सांगितले जाते. काही ठिकाणी सूतकदरम्यान मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्याची पद्धत आहे.
ग्रहणकाळात अनावश्यक वादविवाद, ताणतणाव टाळणे आणि शांत वातावरण राखणे मानसिक आरोग्यास हितावह ठरते. पलंगावर झोपणे किंवा विलासी वर्तन टाळावे.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असुन न्यूज १८ मराठी कुठकाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहण,या काळात काय करावं काय टाळावं? A TO Z माहिती










