दहशतवादी हल्ले, देशातून विरोध, तरी IND vs PAK मॅच का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचचं धक्कादायक उत्तर

Last Updated:

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केली आहे. युएईविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला, यानंतर आता टीम इंडियाचा पुढचा सामना 14 तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

दहशतवादी हल्ले, देशातून विरोध, तरी IND vs PAK मॅच का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचचं धक्कादायक उत्तर
दहशतवादी हल्ले, देशातून विरोध, तरी IND vs PAK मॅच का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचचं धक्कादायक उत्तर
दुबई : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केली आहे. युएईविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला, यानंतर आता टीम इंडियाचा पुढचा सामना 14 तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला जात आहे, त्यातच टीम इंडियाच्या बॅटिंग प्रशिक्षकांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सितांशू कोटक?

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयाचं बीसीसीआयने समर्थन केलं आहे, तेव्हापासून टीमचं लक्ष पूर्णपणे क्रिकेटवर आहे, असं सितांशू कोटक म्हणाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होत आहे.
advertisement
'बीसीसीआयने सरकारच्या निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितल्यापासून, आमचे लक्ष नेहमीच सामन्यावर राहिले आहे. हा भारत-पाकिस्तान सामना आहे, त्यामुळे तो मनोरंजक असेल. भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमीच स्पर्धात्मक मॅच होते', असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.

काश्मीर हल्ल्यानंतरचा सामना का?

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावामुळे क्रिकेटपटू खरोखरच प्रभावित होऊ शकतात का? असा प्रश्नही सितांशू कोटक यांना विचारण्यात आला. 'खेळाडू मैदानावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या मनात दुसरे काहीही नाही', असं उत्तर कोटक यांनी दिलं. काश्मीरमधील हल्ल्यानंतर, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी तीव्र झाली आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दहशतवादी हल्ले, देशातून विरोध, तरी IND vs PAK मॅच का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचचं धक्कादायक उत्तर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement