Weather Alert: महाराष्ट्रावर शनिवारी अस्मानी संकट, 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
भारतीय हवामान खात्याने 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच भागांत हवामानात बदल दिसून येणार आहे.
भारतीय हवामान खात्याने 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच भागांत हवामानात बदल दिसून येणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. पाहुयात 13 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला असून, येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement