India Win Asia Cup 2025: पाकिस्तानला 'औकात' दाखवली, कोच गौतम गंभीरची रिएक्शन अन् टीम इंडिया विजयी

Last Updated:

भारतीय संघाने संयमी खेळी करून पाकिस्तानला तोंडावर पाडलं. विशेष म्हणजे, या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात कोच गौतम गंभीर हे संयमीपणे टीमच्या बाजूने उभे होते.

News18
News18
दुबई: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. अशातच आशिया कप २०२५  मध्ये दोन्ही देशामध्ये सामने खेळवले गेले. पण, इथंही पाकिस्तानाला भारतीय टीमने औकात दाखवलीच. फायलनमध्ये कसेबसे पोहोचलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने संयमी खेळी करून तोंडावर पाडलं. विशेष म्हणजे, या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात कोच गौतम गंभीर हे संयमीपणे टीमच्या बाजूने उभे होते. जेव्हा तिलक वर्माने विजयी सिक्स लगावला तेव्हा कोच गंभीरमधला खेळाडू बाहेर आला.
आशिया कप २०२५ ची सांगता भारताच्या विजयाने झाली. पाकिस्तानला लोळवत भारताने आम्हीच आशियाचे किंग असल्याचं दाखवून दिलं. १४७ रन्सचं टार्गेट भारतीय संघाने तिलक वर्माच्या झुंझार खेळीच्या बळावर विजय मिळवला. भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. पण, भारताची सुरुवात ही खराब होती. अभिषेक शर्मा, शुममन गिल, कर्णधार सुर्या सुद्धा आऊट झाला. पण, तिलक वर्माने शेवटपर्यंत विजय खेचून आणला. शेवटच्या ओव्हरमध्ये १० रन्स हवे होते. हरिफ राऊफ बॉलिंगला होता. त्याने पहिला बॉल स्लो टाकला. त्यानंतर ५ रन्समध्ये १० रन्स हवे होते. तिलक वर्माने समोर खणखणीत सिक्स मारला, मग काय भारताचा विजय हा जवळपास निश्चित झाला. टीम आणि मैदानात आनंदाचं वातावरण पसरलं.
advertisement
कोच गौतम गंभीर इतक्यावेळ शांतपणे आणि प्रेशरमध्ये होते. जसं तिलकने सिक्स मारला, त्यांनी टेबलावर जोरात हात मारला आणि आम्ही जिंकलो, असंच सांगून टाकलं. नंतर पुढे तिलकने एक रनसाठी धाव घेतली आणि रिंकूने पहिल्याच बॉलवर चौकार लगावून विजय मिळवून दिला.
मैदानात एंट्री
विशेष म्हणजे, जेव्हा टीम इंडियाची परिस्थिती नाजूक होती. सलामीचे फलंदाज आऊट झाले होते, भारताच्या ४ विकेट पडल्या होत्या. तेव्हा टीम इंडिया दबावाखाली होती. मधला ब्रेक जेव्हा झाला होता तेव्हा कोच गौतम गंभीर मैदानात आला होता. त्यांनी तिलक वर्मा आणि शुभम दुबे या दोघांशी चर्चा केली. संयमाने खेळा, प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार, सिक्सर लावून रनरेट कमी करा, असाच सल्ला दिला असावा, कारण, त्यानंतर तिलक वर्मा आणि दुबेनं चौकार, सिक्सर लगावून टीमवरच प्रेशर कमी केलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India Win Asia Cup 2025: पाकिस्तानला 'औकात' दाखवली, कोच गौतम गंभीरची रिएक्शन अन् टीम इंडिया विजयी
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement