advertisement

BCCIच्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग,4 खेळाडूंवर FIR, क्रिकेट खेळण्यावर बंदी, रियान परागशी कनेक्शन

Last Updated:

बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याची घटना घडली आहे. या संबंधित पुरावे मिळाल्यानंतर 4 खेळाडूंवर एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.आणि आता या खेळाडूंवर बोर्डाने निलंबनाची कारवाई केली आहे.

syed mushtaq ali trophy match fixing
syed mushtaq ali trophy match fixing
SMAT 2025 : बोर्ड क्रिकेट काऊन्सिल ऑफ इंडिया अर्थात बीसीआयकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा खेळवल्या जातात. या स्पर्धा पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी प्रयत्न असतो.पण आता बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याची घटना घडली आहे. या संबंधित पुरावे मिळाल्यानंतर 4 खेळाडूंवर एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.आणि आता या खेळाडूंवर बोर्डाने निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंचा रियाग परागशी खास कनेक्शन आहे.त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? आणि रियानचा या खेळाडूंशी संबंध काय आहे? हे जाणून घेऊयात.
बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मॅच फिक्सिंग घटना घडली आहे.या फिक्सिंग प्रकरणी आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) ने अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चार खेळाडूंना निलंबित केले आहे.या चार खेळाडुंवर रियान परागच्या नेतृत्वाखालील संघातील खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे काय?
प्राथमिक चौकशीत चार खेळाडूंविरुद्ध पुरावे आढळले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.रियान परागच्या नेतृत्वाखालील आसाम संघाने 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत लखनौमध्ये लीग सामने खेळले. संघ सुपर लीग टप्प्यासाठी पात्र ठरू शकला नाही.
advertisement
"चारही खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रसंगी आसामचे प्रतिनिधित्व केले आहे. असा आरोप आहे की त्यांनी 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत लखनौमध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या आसाम संघातील काही सध्याच्या खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे आसाम क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे.
"आरोपांनंतर, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा पथकाने (एसीएसयू) चौकशी केली.आसाम क्रिकेट असोसिएशननेही फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की चारही खेळाडूंनी चुकीच्या कृत्यांमध्ये सहभाग घेतला आहे, ज्यामुळे खेळाची प्रतिष्ठा खराब झाली आहे, असेही आसाम क्रिकेट असोसिएशन म्हणाला आहे.
advertisement
तसेच खेळाडूंना कोणत्याही क्रिकेटशी संबंधित कार्यात भाग घेण्यास बंदी घातली आहे."खेळाडूंना निलंबित करण्याचा उद्देश परिस्थिती वाढू नये म्हणून आहे. निलंबनाच्या कालावधीसाठी, खेळाडूंना आसाम क्रिकेट असोसिएशन, जिल्हा युनिट्स किंवा संलग्न क्लबद्वारे आयोजित कोणत्याही राज्यस्तरीय स्पर्धेत किंवा सामन्यात भाग घेण्यास बंदी आहे. त्यांना मॅच रेफरी, प्रशिक्षक, पंच इत्यादी म्हणून काम करण्यासह कोणत्याही क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापात भाग घेण्यास देखील बंदी आहे.
advertisement
तपासाचा अंतिम निकाल येईपर्यंत किंवा असोसिएशनचा पुढील निर्णय येईपर्यंत निलंबन लागू राहील.सर्व जिल्हा संघटनांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि आवश्यक कारवाईसाठी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील क्लब आणि क्रिकेट अकादमींना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आसाम क्रिकेट असोसिएशनने 12 डिसेंबर 2025
रोजी गुवाहाटी येथील गुन्हे शाखेत या चारही खेळाडूंविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCIच्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग,4 खेळाडूंवर FIR, क्रिकेट खेळण्यावर बंदी, रियान परागशी कनेक्शन
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement