Team India : गर्लफ्रेंडला घेऊन कोलंबोला आला, BCCI ने सांगूनही टीम इंडियाचा स्टार ऐकला नाही? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय खेळाडूंना दौऱ्यावर असताना त्यांची पत्नी अथवा गर्लफ्रेंडसोबत राहण्याची बंदी बीसीसीआयने घातली आहे, पण तरीही टीम इंडियाचा स्टार कोलंबोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पोहोचला.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा 61 रननी पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेलं 176 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये 114 रनवर ऑल आऊट झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम पुन्हा एकदा मायदेशात परतली आहे, कारण टीमचा पुढचा सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध अहमदाबादमध्ये होणार आहे.
पाकिस्तानची टीमने भारतामध्ये खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामने हे कोलंबोमध्ये होत आहेत, त्यामुळे टीम इंडियालाही एका सामन्यासाठी कोलंबोला जावं लागलं. कोलंबोमध्ये टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंडही त्याच्यासोबत दिसली आहे, त्यामुळे हार्दिक पांड्याने बीसीसीआयचा आदेश धुडकावला का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
टीम इंडिया कोलंबोहून भारतात यायला निघाली तेव्हा एअरपोर्टवर हार्दिक पांड्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा होती. याआधी माहिका शर्मा हार्दिक पांड्यासोबत टीम हॉटेलमध्येही दिसली होती.
advertisement
The Indian cricket team departed from Colombo a while ago
Indian fans at the airport went absolutely CRAZY after catching a glimpse of their heroes post win vs PAK
Full inside airport visuals https://t.co/lTEjTNfQc0#TeamIndia #INDvsPAK #T20WorldCup pic.twitter.com/rkRaLB9fA4
— Ankan Kar (@AnkanKar) February 16, 2026
advertisement
बायको-गर्लफ्रेंडसाठी बीसीसीआयचा नियम
भारतीय टीम मॅनेजमेंटने वर्ल्ड कपदरम्यान खेळाडूंना त्यांची पत्नी अथवा गर्लफ्रेंडसोबत प्रवास करायला परवानगी द्या, अशी विनंती बीसीसीआयकडे केली होती, पण बीसीसीआयने खेळाडूंची ही विनंती मान्य केली नाही. सध्याच्या नियमांनुसार, टीम इंडियाचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी कुटुंबियांना सोबत आणण्याची परवानगी आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने नवीन धोरण तयार केलं, यात परदेश दौऱ्यांवर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीबाबत कालमर्यादा निश्चित केली गेली. टीमचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी त्यांच्या कुटुंबाला सोबत आणण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती.
टी-20 वर्ल्ड कप हा एका महिन्याच्या कालावधीचा आहे, त्यामुळे खेळाडूंच्या पार्टनरना टीमसोबत राहण्याला परवानगी नाही, तरी हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने टीमसोबत प्रवास कसा केला? असा प्रश्न विचारला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गर्लफ्रेंडला घेऊन कोलंबोला आला, BCCI ने सांगूनही टीम इंडियाचा स्टार ऐकला नाही? Video










