रिचार्ज पुन्हा महाग होणार? Airtel च्या MDची टॅरिफ वाढवण्याची मागणी

Last Updated:

Airtel Price Hike: एअरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल विठ्ठल यांनी सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी दरवाढीची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत रिचार्ज प्लॅन पुन्हा महाग होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एअरटेल प्लॅन्स
एअरटेल प्लॅन्स
Airtel MD Gopal Vittal: काही काळापूर्वी भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या नावांचा समावेश आहे. मोठी वाढ करून, कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅन 26% ने महाग केले आहेत. यूझर्स आताच या धक्क्यातून सावरत असताना अशीच आणखी एक बातमी येत आहे. एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी दरवाढीची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत रिचार्ज प्लॅन पुन्हा महाग होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोपाळ विठ्ठल यांनी ही मागणी केली
भारती एअरटेलचे एमडी गोपाल विठ्ठल यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी दर वाढवण्याची वकिली केली आहे. ते म्हणतात की, भारताच्या दूरसंचार क्षेत्रात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड (ROCE) अजूनही कमी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या कमाईच्या स्टेटमेंटमध्ये, विठ्ठल म्हणाले की, कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि कर्ज कमी करण्यासाठी देखील काम सुरू आहे. ते असेही म्हणाले की "उद्योगाला पुढे जाण्यासाठी दर वाढवण्याची गरज आहे कारण अजूनही ROCE फक्त 11% आहे."
advertisement
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या तीन वर्षांत टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती दोनदा एकूण 40% ने वाढवल्या आहेत. जुलै 2024 मध्ये देखील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनचे दर 26% ने वाढवण्याची घोषणा केली होती.
एअरटेलने लॉन्च केली नवी प्रणाली
अलीकडेच, एअरटेलने स्पॅम कॉल्स आणि मेसेज थांबवण्यासाठी एक नवीन AI-शक्तीवर चालणारे स्पॅम डिटेक्शन सोल्यूशन लॉन्च केले आहे. हे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि सर्व एअरटेल ग्राहकांसाठी ऑटोमैटिकली अॅक्टिव्हेट होतील. विठ्ठल म्हणाले, 'एअरटेल ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी त्याच्या नेटवर्कमध्ये गुंतवणूक करत आहे. आम्ही भारतातील पहिले AI-शक्तीवर चालणारे नेटवर्क-आधारित स्पॅम डिटेक्शन सोल्यूशन लॉन्च केले आहे. Airtel चे 5G नेटवर्क पुन्हा एकदा ओपन सिग्नलद्वारे ओळखले गेले आहे.'
advertisement
गोपाळ विठ्ठल यांच्याकडे नवी जबाबदारी आली
गोपाल विठ्ठल यांना एअरटेलमध्येही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. गोपाल विट्टल यांना भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक तसेच उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. 1 जानेवारी 2026 पासून ते कार्यकारी उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी स्वीकारतील.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
रिचार्ज पुन्हा महाग होणार? Airtel च्या MDची टॅरिफ वाढवण्याची मागणी
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement