जालना : बदलत्या जीवन पद्धतीनुसार आपल्या खानपानाच्या पद्धतीमध्येही बरेच बदल झाले आहेत. हल्ली जेवणानंतर वेगवेगळी पेय खाद्यपदार्थ तसेच गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये आईस्क्रीम, मिल्क शेक, दूध, कॉफी इत्यादी खाद्यपदार्थ आणि पेय यांचा समावेश होतो. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात. यामुळे अपचन, लठ्ठपणा, हृदयाचे आजार यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर कोणते खाद्यपदार्थ घेणे टाळावे, याबाबत ओबीसीटी कन्सल्टंट डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.