छत्रपती संभाजीनगर : स्वयंपाकघरातील अत्यावश्यक मानले जाणारे गरम आणि खडा मसाल्यांचे दर गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः मिरचीच्या दरवाढीचा परिणाम इतर मसाल्यांवरही झाला असून अनेक लवंग, दालचिनीसह विविध मसाल्यांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते काही मसाल्यांच्या दरात प्रतिकिलो 100 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.



