मुंबई : अनेक जण नोकरीकरत व्यवस्याला प्राधान्य देत आहेत. प्रभादेवीमधील अपूर्वा आणि अक्षय यांना कॉर्पोरेट नोकरी करत असतानाच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि यातूनच मस्त खाऊ तृप्त राहू या फूड कार्टचा प्रारंभ झाला. दोन वर्षांपूर्वी केलेला विचार आज अस्तित्वात उतरला आहे. अपूर्वा सांगतात, आम्ही दोघेही फूड प्रेमी आहोत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्स टेस्ट करायला आवडतात आणि हाच अनुभव आमच्या फूड व्यवसायाला चालना देत आहे.
Last Updated: November 19, 2025, 15:58 IST