कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple age gap : भारतात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडपेक्षा वयाने खूपच मोठी आहे. अशा बहुतेक प्रकरणांचा शेवट मृत्यूमध्ये झाला आहे. यातील काही प्रकरणं महाराष्ट्रातील आहेत.
नवी दिल्ली : प्रेम हे एकेकाळी सर्वात सुंदर नातं मानलं जात असे. लोक म्हणायचे की जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करत असतील तर जग काय विचार करतं याने काही फरक पडत नाही. पण आजकाल अशी काही प्रकरणं समोर येत आहेत जी या विचारसरणीला धक्का देतात. गेल्या काही वर्षांत भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून धक्कादायक बातम्या आल्या आहेत . त्यात एक गोष्ट सामान्य होती, एक असं नातं ज्यामध्ये स्त्री पुरुषापेक्षा खूप मोठी होती.
कपलमध्ये कधी 10 वर्षांचा, कधी 20 वर्षांचा, तर कधी 30 वर्षांचाही फरक. समाजाची पर्वा न करता दोघंही प्रेमात पडले. पण या प्रेमाने खूप वाईट वळण घेतलं. कोणी मारला गेला, कोणी आत्महत्या केली, तर कुठेतरी हत्येला अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला. हा ट्रेंड समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण ही फक्त एका मुलीची किंवा मुलाची कहाणी नाही. ही आपल्या समाजाची विचार करण्याची पद्धत, नात्यांमधील शंका आणि अहंकार आणि मानसिक ताणाची खोली दर्शवते.
advertisement
भारतातील काही प्रकरणं
मे 2024 मध्ये नागपूरमधील एका ऑफिसमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. तिच्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले होते. मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तिचा 25 वर्षीय प्रियकर होता. त्याने पोलिसांना सांगितलं, " ती माझ्याशी बोलत नव्हती. मला ते सहन होत नव्हतं."
advertisement
त्याचप्रमाणे राजस्थानमधील झुंझुनू इथं एका 45 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. प्रथम ते दारू प्यायले नंतर त्यांनी हल्ला केला आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वांना सांगितलं की हा एक अपघात होता. पण पोलीस तपासात सर्व काही बाहेर आलं.
तेलंगणामध्ये एका महिलेने तिच्या वयस्कर बॉसच्या संगनमताने तिच्या पतीची हत्या केली. तिचे तिच्या बॉसशी प्रेमसंबंध होते. या नात्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. पण जेव्हा पतीची हत्या झाली आणि सर्व काही उघडकीस आलं तेव्हा या नात्याचं सत्यही उघड झालं.
advertisement
वयातील फरक हेच एकमेव कारण आहे का?
या सर्व प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, वयातील फरक. जेव्हा वयात इतका मोठा फरक असतो तेव्हा नातेसंबंध अनेकदा भावनिक संतुलन राखत नाही. बऱ्याच वेळा तरुण जोडीदाराला नात्याचं गांभीर्य समजत नाही आणि जेव्हा नातं तुटतं किंवा त्यात अडथळा येतो तेव्हा राग, सूड किंवा अहंकार खूप धोकादायक रूप धारण करतात.
advertisement
दुसरीकडे समाज आणि कुटुंबदेखील अशा नात्यांचा सहज स्वीकार करत नाही. जर स्त्री वयाने मोठी असेल तर तिला अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. काही लोक या नात्याला 'अश्लील' देखील म्हणतात आणि जेव्हा दबाव वाढतो तेव्हा नाते ते सहन करू शकत नाही.
Location :
Delhi
First Published :
July 04, 2025 11:34 AM IST
मराठी बातम्या/Viral/
कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू