‘सुहागरात’चा खरा अर्थ काय? याबद्दल तुमचाही आहे का गैरसमज? वाचा खरी माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर सुहागरात की फक्त नवरा-बायकोमधील शारीरिक संबंधापूर्ती मर्यादीत नसून त्यामागे खोल सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे.
मुंबई : सुहागरात हा शब्द बोलला किंवा ऐकला तर लोकांना आठवते की नवरा-बायकोची लग्नानंतरची पहिली रात्र. फुलांनी बिछाना आणि खोली सजवली. नवऱ्याची वाट पाहाणारी लाल रंगातील साडीत लाजणारी नवरी. सुहागरातला नवरा-बायको जवळ येतात किंवा एक होतात. त्यांच्यात शारीरिक संबंध होता वैगरे वैगरे... सिनेमात आपण असंच काहीसं पाहिलं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात सुहागरातची एक कॉन्सेप्ट फिक्स झाली आहे. पण तुम्हाला माहितीय का की सुहागरातचा खरा अर्थ काय?
खरंतर सुहागरात की फक्त नवरा-बायकोमधील शारीरिक संबंधापूर्ती मर्यादीत नसून त्यामागे खोल सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो.
खरंतर ‘सुहाग’ आणि ‘रात’ अशा दोन शब्दांचा मिळून ‘सुहागरात’ हा शब्द बनलेला आहे, ‘सुहाग’ म्हणजे विवाहित स्त्रीचं सौभाग्य, तिच्या पतीशी जोडलेलं प्रेम आणि नातं. ‘रात’ अर्थात रात्र. हे दोन्ही शब्द एकत्र केल्यावर ‘सुहागरात’ म्हणजे नवविवाहित जोडप्याची पहिली रात्र होते, जी त्यांच्या वैवाहिक जीवनाची नवी सुरूवात दर्शवते.
advertisement
भारतीय परंपरेत सुहागरात केवळ शारीरिक जवळीक यापुरती मर्यादित नाही. ही रात्र एकमेकांना समजून घेण्याची, संवाद साधण्याची आणि विश्वास निर्माण करण्याची संधी असते. नवरा-बायको म्हणून या नात्याची पहिली पायरी ही सुहागरात असते. प्राचीन ग्रंथांमध्येही या रात्रीचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे.
सुहागरातशी निगडीत अनेक पारंपरिक रीतिरिवाज आहेत. नववधूला सोळा श्रृंगारात सजवलं जातं. फुलांनी सजवलेली सेज, मिठाई, दूधाचा ग्लास यांसारख्या परंपरा वातावरणात गोडवा आणतात. या लहानशा गोष्टी नवदांपत्याच्या नात्यात प्रेम, आदर आणि आपुलकी निर्माण करतात.
advertisement
कालांतराने या रिती आणि भावना जरी टिकून असल्या तरी आजच्या काळात अनेक नवविवाहित जोडपी या रात्रीबद्दल आपली मते आणि अपेक्षा स्वतःच्या सोयीप्रमाणे ठरवतात. एकमेकांच्या संमतीने, जिथे दोघांनाही सहजता वाटते, तिथेच ही रात्र अधिक अर्थपूर्ण ठरते.
सुहागरात ही केवळ एक रात्र नाही, ती एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रेम, समजूत, आणि आयुष्यभर साथ देण्याच्या वचनाची. ही परंपरा जपली जाते कारण ती फक्त शरीराचं नव्हे, तर मनाचं, संस्कृतीचं आणि नात्याचंही प्रतीक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 10:22 PM IST


