नारळात पाणी येतं कुठून? जादू नाही, निसर्गाची अद्भूत कमाल! 'अशी' आहे पाण्याच्या निर्मितीची गोष्ट
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
जेव्हा आपण नारळ फोडतो, तेव्हा आतून थंडगार पाणी बाहेर येतं. पण नारळाच्या आत पाणी येतं कुठून हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया...
जेव्हा नारळाचं झाड फळ देतं, तेव्हा ते फक्त बाहेरून एक कठीण कवचाचं फळ तयार करत नाही, तर त्याच्या आत एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू असते. नारळाचं फळ जसं झाडावर वाढायला लागतं, तसंच त्याच्यात एक बी म्हणजेच खोबरं तयार होतं. या बीला वाढण्यासाठी पोषक तत्वं आणि पाण्याची गरज असते. झाड जमिनीतून पाणी आणि आवश्यक पोषक तत्वं शोषून घेतं आणि ते नारळात पाठवतं. हे पाणी हळू हळू नारळाच्या आत जमा होतं आणि काही दिवसांनी ते शुद्ध, गोड आणि पौष्टिक द्रवात बदलतं. हेच ते नारळपाणी जे आपण पितो.
बी जिवंत ठेवण्यासाठी नारळपाणी तयार होतं
नारळाच्या आत एक पोकळी असते, ज्यात हे पाणी साठवलेलं असतं. जेव्हा नारळ नवीन आणि कच्चा असतो, तेव्हा पाण्याची मात्रा सर्वात जास्त असते. कारण त्यावेळी बी खूप लहान असतं आणि त्याला जास्त पाण्याची गरज असते. जसा नारळ पिकतो, तसतसं पाणी हळू हळू कमी व्हायला लागतं आणि ते घट्ट होऊन मलई किंवा खोबरं (कोपरा) बनतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही हिरवा नारळ पिता, तेव्हा तुम्हाला जास्त पाणी आणि कमी गर मिळतो. दुसरीकडे, बाजारात मिळणारा कठीण कवचाचा सुका नारळ असतो, त्यात पाणी कमी आणि खोबरं जास्त असतं.
advertisement
नारळपाणी जादू नाही, तर निसर्गाचं विज्ञान आहे
अनेक लोकांना वाटतं की नारळात कुठूनतरी पाणी भरलेलं असतं, पण खरं तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे पाणी झाडाच्या मुळांमधून शोषलेलं स्वच्छ आणि फिल्टर केलेलं द्रव्य असतं, जे बिच्या पोषणासाठी आवश्यक असतं. ही सगळी प्रक्रिया निसर्गाने अशा प्रकारे तयार केली आहे की नवीन रोपाला वाढण्यासाठी आवश्यक पोषण मिळू शकेल. म्हणूनच नारळपाणी इतकं शुद्ध आणि फायदेशीर असतं.
advertisement
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नारळ प्याल, तेव्हा हे लक्षात ठेवा…
पुढच्या वेळी नारळपाणी पिताना हसा आणि विचार करा की, हे फक्त साधं पाणी नाहीये. ही निसर्गाची एक सुंदर भेट आहे, जी कोणतीही मशीन किंवा पाईपलाईनशिवाय स्वतःहून नारळाची झाडं तयार करतात. आणि ही सगळी जादू फक्त बी ला जिवंत ठेवण्यासाठी होते.
हे ही वाचा : गावकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! 'या' तेलाने होतात शेकडो आजार बरे, या झाडाची शेतीही आहे फायद्याची...
advertisement
हे ही वाचा : Health Tips : आयुर्वेदात 'ही' वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 11:20 AM IST
मराठी बातम्या/Viral/
नारळात पाणी येतं कुठून? जादू नाही, निसर्गाची अद्भूत कमाल! 'अशी' आहे पाण्याच्या निर्मितीची गोष्ट