Agrcultre News : परतीच्या पावसाने घेतला पपई बागेचा बळी, शेतकऱ्याचे 15 लाखांचे नुकसान, लावलेला खर्चही निघाला नाही
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
महाराष्ट्रसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि आर्थिक नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे पपई फळबाग पिवळा पडला असून फळे सडली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि आर्थिक नुकसान झाले असून याबरोबरच छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी येथील शेतकरी दादाराव वीर यांच्या अडीच एकर शेतामध्ये पपईचा फळबाग आहे. दरवर्षी त्यांना या शेतीच्या माध्यमातून 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असते. मात्र यंदा परतीच्या पावसामुळे पपई फळबाग पिवळा पडला असून फळे सडली आहेत. त्यामुळे लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. परतीच्या पावसामुळे वीर यांच्या पपई बागेचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले, यामुळे शासनाने शेतीला लागलेल्या खर्चापेक्षा निम्मी आर्थिक मदत जरी केली तर पुढच्या तयारीला पैसे कामाला येतील, असे वीर यांनी लोकल 18 सोबत बोलताना म्हटले आहे.
नक्षत्रवाडी येथे नोव्हेंबर 2024 मध्ये पपई फळ बागेची लागवड करण्यात आली. यंदाच्या जुलैमध्ये पपई काढणीला सुरुवात होणार होती. मे महिन्यापासून सारखा पाऊस आतापर्यंत सुरूच आहे. 4 महिने जमिनीमध्ये वापसा होईल अशी परिस्थितीच नव्हती. पाण्याचा अतिरेक झाडांवर जास्त प्रमाणात झाला त्यामुळे पाने पिवळी पडली. पपई झाडांचा पाला खराब झाल्यामुळे फळाची गुणवत्ता ढासळली त्यामुळे व्यापारी देखील बागेकडे फिरकून बघायला तयार नाही, अशी प्रतिक्रिया देखील वीर यांनी दिली.
advertisement
पपई फळाची परतीच्या पावसामुळे गोडीच गेली. जिथे दोन एकर मध्ये 12 ते 13 लाख रुपयांचे उत्पन्न निघणे अपेक्षित होते. तिथे मात्र 1 लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि खर्च 3 लाख रुपये झाला यामुळे पूर्णतः नुकसान झाले/ आतापर्यंत वीर यांच्या शेतात कुठल्याही प्रशासकीय किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही यानंतर मात्र शासन यावर काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 01, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agrcultre News : परतीच्या पावसाने घेतला पपई बागेचा बळी, शेतकऱ्याचे 15 लाखांचे नुकसान, लावलेला खर्चही निघाला नाही

