advertisement

बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगराईचा धोका? वेळीच घ्या अशी काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

हिवाळा ऋतूमध्ये पिकांवरील रोगराईचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसून येते. यामागे हवामानाशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणे जबाबदार आहेत.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात पिकांवर होतो रोगांचा प्रादुर्भाव अधिक

बीड : हिवाळा ऋतूमध्ये पिकांवरील रोगराईचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसून येते. यामागे हवामानाशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणे जबाबदार आहेत. या काळात तापमान मध्यम ते कमी राहते, तसेच पहाटे दव पडण्याचे प्रमाण वाढते. दवामुळे पिकांच्या पानांवर दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो, जो विविध रोगकारक जिवाणू आणि बुरशींसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे आरोग्य सांभाळणे आव्हानात्मक ठरते, अशी माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
हिवाळ्यात प्रामुख्याने करपा, तांबेरा, पानांवरील डाग, भुरी यांसारखे बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ढगाळ वातावरण आणि कमी सूर्यप्रकाशामुळे पानांवरील ओलावा लवकर सुकत नाही. परिणामी, रोगकारक बुरशी आणि जिवाणूंची वाढ वेगाने होते आणि रोगाचा प्रादुर्भाव अल्पावधीत संपूर्ण शेतात पसरतो. अनेक वेळा सुरुवातीला किरकोळ दिसणारी लक्षणे पुढे गंभीर स्वरूप धारण करतात.
advertisement
थंड हवामानाचा पिकांच्या वाढीवरही प्रतिकूल परिणाम होतो. कमी तापमानामुळे पिकांची वाढ मंदावते आणि त्यांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती घटते. यामुळे पिके रोगांना अधिक बळी पडतात. विशेषतः भाजीपाला, डाळी आणि तेलबिया पिकांमध्ये हिवाळ्यात रोगांचा धोका अधिक प्रमाणात दिसून येतो. योग्य काळजी न घेतल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
advertisement
याशिवाय हिवाळ्यात शेतात जास्त काळ पाणी साचणे, दाट लागवड करणे आणि नत्रयुक्त खतांचा अति वापर हेही रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरतात. दाट लागवडीमुळे हवा खेळती राहत नाही, तर जादा नत्रामुळे पिकांची कोवळी वाढ होते, जी रोगांसाठी अधिक संवेदनशील असते. थंडीत सूक्ष्मजीवांचा प्रभाव वाढत असताना पिकांची संरक्षणक्षमता कमी असल्याने संसर्ग वेगाने पसरतो.
advertisement
हिवाळ्यातील रोगराईपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. संतुलित खत व्यवस्थापन, योग्य अंतरावर लागवड, वेळेवर आणि मर्यादित पाणी व्यवस्थापन आणि रोगप्रतिकारक वाणांचा वापर केल्यास रोगांचे प्रमाण कमी करता येते. रोगाची लक्षणे दिसताच कृषी तज्ज्ञांनी शिफारस केलेली जैविक किंवा रासायनिक फवारणी योग्य वेळी केल्यास पिके सुरक्षित राहून उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगराईचा धोका? वेळीच घ्या अशी काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement