चीनने टाकला बंदीचा बॉम्ब', भारतीय शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट; रब्बी पिकांचं गणित बिघडलं

Last Updated:

China Fertilizers: भारताला खतांच्या पुरवठ्याचा मोठा झटका बसला आहे. चीनने १५ ऑक्टोबरपासून सर्व स्पेशालिटी फर्टिलायझरची निर्यात बंद केली असून यामुळे देशात खतांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

News18
News18
बीजिंग: भारत आपल्या एकूण स्पेशॅलिटी खतांची (Specialty Fertilizer) ९५ टक्के गरज चीनकडून पूर्ण करतो, ज्यामध्ये फॉस्फेट (TMAP) आणि युरिया सोल्यूशन (AdBlue) सारखी उत्पादने समाविष्ट आहेत. सॉल्यूबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन (SFIA) चे अध्यक्ष राजीब चक्रवर्ती यांनी सांगितले की, चीनने “१५ ऑक्टोबरपासून निर्यात खिडकी पूर्णपणे बंद केली आहे” आणि ही बंदी “किमान पुढील ५६ महिन्यांपर्यंत लागू राहू शकते.” या निर्णयानंतर भारतातील खतांच्या किंमती १०१५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. चक्रवर्ती म्हणाले, “स्पेशॅलिटी खतांच्या किंमती आधीच असामान्यरीत्या जास्त आहेत आणि आता त्या आणखी वाढतील.”
advertisement
भारत दरवर्षी सुमारे २.५ लाख टन स्पेशॅलिटी खतांचा वापर करतो. ज्यामधील जवळपास ६५ टक्के वापर रब्बी हंगामात (ऑक्टोबर ते मार्च) केला जातो. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या हंगामासाठी सध्या चिंता करण्याचे काही कारण नाही, कारण व्यापाऱ्यांनी आधीच जागतिक एजन्स्यांच्या माध्यमातून पुरेसा साठा तयार करून ठेवला आहे. परंतु जर चीनची ही बंदी मार्च २०२६ नंतरही कायम राहिली, तर समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.
advertisement
भारताकडे काही पर्याय आहेत जसे की दक्षिण आफ्रिका, चिली आणि क्रोएशिया; पण हे पर्याय फक्त एक-दोन उत्पादनांपुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे चीनकडून पुरवठा थांबणे हे भारतासारख्या मोठ्या कृषीप्रधान देशासाठी मोठा धक्का आहे. विशेषतः रब्बी पिकांच्या पेरणीची तयारी सुरू असताना. खतांचे दर वाढल्यास गहू, हरभरा आणि मोहरी यांसारख्या पिकांची उत्पादनखर्च वाढू शकतो, ज्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्राहकांच्या खर्चावरही होऊ शकतो.
advertisement
चीन हा जगातील सर्वात मोठा खत उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. मे ते ऑक्टोबर दरम्यान चीनने मर्यादित प्रमाणात निर्यातीस परवानगी दिली होती. परंतु वाढत्या देशांतर्गत मागणीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे आता पुन्हा निर्यात बंद केली आहे. या निर्णयामुळे केवळ भारताच नव्हे तर संपूर्ण आशिया आणि आफ्रिका खंडातील खत बाजारांमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
भारतासाठी सध्या दिलासा देणारी बाब म्हणजे रब्बी हंगामासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. परंतु किंमतींमध्ये वाढ होणार हे निश्चित आहे. जर चीनने मार्चनंतरही निर्यात पुन्हा सुरू केली नाही, तर २०२६ च्या खरीप हंगामासाठी मोठा संकट निर्माण होऊ शकतो. म्हणजेच चीनचा हा निर्णय सध्या जागतिक खत बाजारातील सर्वात मोठी बातमी ठरला आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या खिशापासून ते खत कंपन्यांपर्यंत सर्व स्तरांवर दिसून येईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
चीनने टाकला बंदीचा बॉम्ब', भारतीय शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट; रब्बी पिकांचं गणित बिघडलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement