TRENDING:

23 वर्षानंतर अंजनी नदीला पूर; होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Last Updated:

Jalgoan News : धरणगाव तालुक्यातील पिंप्री परिसरात तब्बल 23 वर्षांनंतर अंजनी नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात घुसले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे प्रतिनिधी , जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्री परिसरात तब्बल 23 वर्षांनंतर अंजनी नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात घुसले. त्यामुळे हातातोंडी आलेला घास हिरावला गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
agriculture news
agriculture news
advertisement

कपाशी आणि खरीप पिकांचे मोठे नुकसान

अंजनी नदीच्या पाण्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेषतः कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांच्या दहा बिघ्यांवरची पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद आणि भाजीपाला पिकांवरही पुराचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे महिन्यांचे श्रम वाया गेले आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही व्याजाने पैसे काढून शेती केली होती, मात्र आता डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेले आहे.

advertisement

शेतकऱ्यांच्या भावना आणि आक्रोश

पूरामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी अत्यंत विवश झाले आहेत. "सरकारने तातडीने मदत केली नाही, तर आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. "व्याजाने पैसे घेऊन केलेली शेती पाण्याखाली गेली, पिके वाहून गेली, आता आम्ही नेमके काय करायचे?" असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला.

advertisement

प्रशासनावर नाराजी

पुराला तब्बल 40 तास उलटून गेले तरी प्रशासनाकडून पंचनामे झालेले नाहीत, अशी शेतकऱ्यांची मोठी नाराजी आहे. नुकसानाची योग्य नोंद घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोठे आर्थिक संकट

या पुरामुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगरही वाढला आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, औषधे यासाठी घेतलेले कर्ज आणि केलेली गुंतवणूक पूर्णपणे वाया गेली आहे. हातात उत्पन्न नसल्याने व्याजाचा बोजा वाढणार असून शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

advertisement

मदतीची अपेक्षा

शेतकरी वर्गाने शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. पुरामुळे झालेले नुकसान पाहता आपत्ती व्यवस्थापन निधीतून त्वरित आर्थिक मदत द्यावी, पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे.

मराठी बातम्या/कृषी/
23 वर्षानंतर अंजनी नदीला पूर; होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या शेतकऱ्यांनी फोडला टाहो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल