योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त 97,000 रु तर तुषार सिंचनासाठी 47,000 पर्यंत अनुदान मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’ आणि ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ यांचा लाभ घेणे बंधनकारक आहे.
अनुदानाची रचना
ठिबक सिंचन संचासाठी
अल्प/अत्यल्प भूधारक : प्रति थेंब अधिक पीक योजनेतून 55%, मुख्यमंत्री शाश्वत सिंचनातून 25%, आंबेडकर कृषी स्वावलंबनातून 10% — एकूण 90% किंवा 97,000 पर्यंत.
advertisement
बहुभूधारक : अनुक्रमे 45% + 30% + 15% — एकूण 90% किंवा 97,000 पर्यंत.
तुषार सिंचन संचासाठी:
अल्प/अत्यल्प भूधारक : 55% + 25% + 10% — एकूण 90% किंवा 47,000 पर्यंत.
बहुभूधारक : 45% + 30% + 15% — एकूण 90% किंवा 47,000 पर्यंत.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
सिंचनासाठी लागणारा मोठा खर्च सरकारकडून उचलल्याने आर्थिक ओझा कमी होईल.
ठिबक व तुषार पद्धतीमुळे पाणी बचत होईल आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल.
उत्पादनक्षमता वाढेल, कारण पिकांना वेळेवर आणि नियंत्रित सिंचन मिळेल.
खर्च कमी व उत्पन्न जास्त झाल्यामुळे शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ ठरेल.
शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतील, ज्यामुळे जीवनमान उंचावेल आणि शेतीत शाश्वत विकास साधला जाईल.
पात्रता व अटी काय?
लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य (6 हेक्टर मर्यादा लागू नाही).
दुर्गम भागातील 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमिनीच्या शेतकऱ्यांनी मिळून अर्ज करता येईल.
एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही.
याआधी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
शेतकरी ओळख प्रमाणपत्र (महाडीबीटीसाठी आवश्यक)
जात प्रमाणपत्र
बँक पासबुक (आधार लिंक असलेले खाते)
शेतकऱ्याचा फोटो
शेतजमिनीचा नकाशा (गरजेनुसार)
स्वयंघोषणा पत्र (इतर योजनांचा लाभ घेतला नसल्याचे)
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
राज्य सरकारने महाडीबीटी योजनांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही पद्धत लागू केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी त्वरित महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.