TRENDING:

Maha Mrityunjaya Mantra​: शनि नाही देणार त्रास! आज शनिप्रदोषामध्ये महामृत्युंजयाचा उपाय विसरू नका

Last Updated:

Maha Mrityunjaya Mantra​: प्रदोष काळात (संध्याकाळी, सूर्यास्तानंतर) या मंत्राचा जप केल्याने त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. महामृत्युंजय मंत्राला 'त्र्यंबक मंत्र' असेही म्हणतात. हा ऋग्वेदातील एक शक्तिशाली मंत्र आहे. प्रदोष व्रतामध्ये या मंत्राचा जप केल्याने अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शंकराची पूजा करण्यासाठी प्रदोष व्रत महत्त्वाचा मानला जातो. या व्रतामध्ये भक्तीपूर्वक शिव पूजा करणाऱ्या शिवभक्तांना लाभ  मिळतो. या व्रतामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष काळात (संध्याकाळी, सूर्यास्तानंतर) या मंत्राचा जप केल्याने त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. महामृत्युंजय मंत्राला 'त्र्यंबक मंत्र' असंही म्हणतात. हा ऋग्वेदातील एक शक्तिशाली मंत्र आहे. प्रदोष व्रतामध्ये या मंत्राचा जप केल्यानं अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. प्रदोष व्रतामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यासाठी, रुद्राक्ष माळेचा वापर करणे शुभ मानले जाते. 108 वेळा या मंत्राचा जप करणं उत्तम ठरेल. जप करताना महादेवाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा आणि शांत मनाने मंत्राचे उच्चारण करावे.
News18
News18
advertisement

महामृत्युंजय मंत्र

ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

लघु मृत्युंजय मंत्र

ओम जूं स माम् पालय पालय स: जूं ओम.

महामृत्युंजय जप करण्याचे फायदे -

1. शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, व्यक्तिला दीर्घायुष्य मिळतं. या मंत्राचा नियमित जप केल्यानं गंभीर आणि जुनाट आजारांपासून मुक्ती मिळते. महामृत्युंजय मंत्र एक प्रकारचे संरक्षक कवच म्हणून काम करतो. त्यामुळे अकाली मृत्यूचे भय कमी होते आणि व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

advertisement

2. मानसिक शांती आणि स्थिरता - तणाव कमी होतो, दररोज जप केल्याने मानसिक तणाव, चिंता आणि भीती कमी होते. मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते.

3. घरामध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती आणि वाईट ऊर्जा दूर होते. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहदोष, विशेषतः शनि आणि मंगळ यांसारख्या ग्रहांमुळे होणारे अशुभ परिणाम या मंत्राच्या प्रभावाने कमी होतात. हा मंत्र केवळ भौतिक सुखांसाठी नाही, तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आत्मज्ञान आणि मोक्षाच्या दिशेने प्रगती होते.

advertisement

4. धन आणि समृद्धी - आर्थिक अडथळे दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. कोणत्याही महत्त्वाच्या कामात किंवा नवीन सुरू होणाऱ्या कामात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करणे लाभदायक मानले जाते.

हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष कुटुंबाला छळतो

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Maha Mrityunjaya Mantra​: शनि नाही देणार त्रास! आज शनिप्रदोषामध्ये महामृत्युंजयाचा उपाय विसरू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल