TRENDING:

Religious: देवतांच्या परिक्रमांचा नियम चुकवू नका! विधीपूर्वक पूजेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा, शिव-विष्णूसाठी...

Last Updated:

Religious: प्रदक्षिणा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता, शुद्धता आणि मानसिक शांती येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. प्रदक्षिणा करताना, देवाचे ध्यान करावे आणि मंत्रांचा जप करावा. तसं करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सनातन हिंदू धर्मात, देव-देवतांची विधीपूर्वक पूजा करण्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. भाविक भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्तीभावानं पूजा करतात. देवाला फुले, पाणी, फळे इत्यादी अर्पण केले. हिंदू धर्मात, मंदिरात पूजा करताना देवाची प्रदक्षिणा करणे अनिवार्य मानले जाते.
News18
News18
advertisement

प्रदक्षिणा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता, शुद्धता आणि मानसिक शांती येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. प्रदक्षिणा करताना, देवाचे ध्यान करावे आणि मंत्रांचा जप करावा. तसं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. बरेच लोक आपल्या इच्छेनुसार प्रदक्षिणा करतात, परंतु अनेकांना माहित नसते की, कोणत्या देवाची किती वेळा प्रदक्षिणा करावी. कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा शुभ मानल्या जातात याविषयी आज जाणून घेऊया.

advertisement

कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा कराव्यात?

धार्मिक श्रद्धेनुसार, शंकराची अर्धी परिक्रमा, श्री हरि विष्णूला पाच परिक्रमा, विघ्नहर्ता गणेशाला चार परिक्रमा, आदिशक्ती देवी दुर्गेची एक परिक्रमा, सूर्यदेवाची सात परिक्रमा, बजरंगबली हनुमानाला तीन परिक्रमा आणि पिंपळाच्या झाडाला 108 परिक्रमा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

परिक्रमा करताना या मंत्राचा जप करावा -

देवाच्या परिक्रमेदरम्यान मंत्रांचा जप करणे अत्यंत लाभदायक आणि पुण्यपूर्ण मानले जाते. मंत्र असा आहे -

advertisement

‘यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च। तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।’

अलर्ट! शनि-सूर्याचा षडाष्टक योग; अमावस्येला भयंकर अडचणीत सापडणार 3 राशींचे लोक

परिक्रमा कशी करावी?

देवाची श्रद्धेने आणि भक्तीने परिक्रमा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार परिक्रमा नेहमी घड्याळाच्या दिशेने करावी. परिक्रमा करताना देवाचे ध्यान करून मंत्र जप केल्याने पूजेचे फळ अनेक पटींनी वाढते. त्याच वेळी, धार्मिक मान्यतेनुसार, परिक्रमा केल्याने व्यक्ती पापांपासून मुक्त होते, जीवनातील अडचणी दूर होतात आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात. तसेच जीवनात सुख, समृद्धी आणि शुभफळ प्राप्त होते.

advertisement

शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Religious: देवतांच्या परिक्रमांचा नियम चुकवू नका! विधीपूर्वक पूजेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा, शिव-विष्णूसाठी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल