यंदा बारावीचा निकाल साधारण 10 मेपर्यंत, तर दहावीचा निकाल 15 मेपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्यांचे निकाल जलद जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.
advertisement
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई
उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. तसेच झालेल्या विषयांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल 15 मेपूर्वी जाहीर करण्यावर भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होत आहे. मात्र, यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस आधीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्याची तारीख देखील अलीकडे आली आहे.