या पार्श्वभूमीवर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक सडेतोड पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करत असताना आलेला अनुभव उघडपणे शेअर केला आहे.
माझं वेगळं स्थान, मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही; असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
advertisement
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची पोस्ट
"आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला 'हवा येऊ द्या' च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वा. बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले.त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले."
"पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा. सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे.आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा.इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती."
नेटकऱ्यांकडून या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहीजण शरद उपाध्येंच्या अनुभवाला दुजोरा देत आहेत, तर काहीजण याला ‘नकारात्मकता’ असे म्हणत बचाव करत आहेत.