प्रकाश झा यांच्या एका मुलाखतीत त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना शिक्षकांची आपल्या देशासाठी आणि तरुणांसाठी किती गरज आहे हे नमूद केलं. ते म्हणाले, नेहरूंच्या काळात खूप मोठी चूक झाली. IAS, IPSआणि IRSच्या आधी ITS बनवायला पाहिजे होते. इंडियन टिचिंग सर्विसेस. ही सगळ्यात मोठी चुक झाली, खूप मोठी चुक. सगळ्यात इंटेलिजेन्ट लोक जे आहेत ते तिथे जायला हवे होते. आजही देश सुधारेल.
advertisement
( नाटकात मुलींची काम, आचारी होऊन भरलं पोट; अभिनेता 23 दिवस आधीच का सेलिब्रेट करतो बर्थडे? )
प्रकाश झा पुढे म्हणाले, " ITS ला IAS पेक्षा डबल सॅलरी दिली पाहिजे. त्यांना बंगले, गाडी दिली पाहिजे, सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना द्यायला हव्यात. प्रकाश झा यांचा हा व्हिडीओ आणि त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
प्रकाश झा यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, 2005 साली आलेल्या अपहरण, 2011 साली आलेल्या आरक्षण आणि 2010 साली आलेला राजनिती हे त्यांचे सिनेमे खूप हिट झाले. प्रकाश झा हे सिनेक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना राजकीय क्षेत्रातही विशेष रस आहे. 2004 साली त्यांनी चौदावी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना जनतेनं निवडून दिलं नाही.