TRENDING:

सहीसोबत देतात स्वतःचा नंबर, 'मन तुझं जलतरंग' फेम वैभव जोशी यांनी सांगितलं यामागचं कारण

Last Updated:

Mann Tujh Jaltarang fame Vaibhav Joshi : 'मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज....' फेम गीतकार वैभव जोशी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमा दरम्यानचा एक किस्सा शेअर केला. चाहत्यांना ते सहीसोबत त्यांना फोन नंबरही शेअर करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज....' इन्स्टाग्राम स्क्रोल केल्यानंतर सध्या हे गाणं सतत ऐकायला मिळतंय. हे गाणं कोणत्या सिनेमातलं नाही तर गीतकर वैभव जोशी यांच्या कार्यक्रमातील कविता आहे. सध्या सोशल मीडियावर या कवितेनं ट्रेंड बनवला आहे.  गीतकार वैभव जोशी यांच्या 'ऋतू बरवा' या कार्यक्रमात ते ही कविता सादर करतात. प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या बासरीतील सूर या कवितेचा शेवट आणखी सुमधूर करतात.
News18
News18
advertisement

गीतकार वैभव जोशी अनेक वर्ष त्यांच्या कवितांचे कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांच्या 'सोबतीचा करार' या कार्यक्रमाला प्रेक्षक विशेष गर्दी करतात. त्यांच्या कार्यक्रमांना तरुण मंडळी देखील हजेरी लावतात. तरुण मंडळी देखील वैभव जोशी यांचे फॅन्स आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बॅकस्टेजला रांग लागते. तुम्हाला माहिती आहे का, वैभव जोशी चाहत्यांना त्यांची सही तर देतात पण अनेकदा ते त्यांचा नंबर देखील लिहून देतात आणि घरी पोहोचल्यानंतर कळवा असं सांगतात. ऐकून शॉक बसला का? पण हो वैभव जोशी असं करतात. ते असं का करतात हे देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

advertisement

( 'मुंबईत राहतोस मराठी येत नाही', जेव्हा अभिनेत्रीनं घेतली कपिल शर्माची चांगलीच शाळा, VIDEO )

मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वैभव जोशी यांनी सांगितलं, "12.30 ला कार्यक्रम संपला आहे. पार्ल्यात कार्यक्रम संपला आहे उदाहरणार्थ किंवा शिवाजी मंदिरला. असं अनेकदा होतं की, मुली येतात आणि सर सही द्या ना म्हणतात. मी सही करता करता त्यांना विचारतो, काय बाळा नाव तुझं. कुठून आलीस? मग ती सांगते सर डोंबिवली." हे ऐकून वैभव जोशी शॉक होतात.

advertisement

वैभव जोशी पुढे म्हणाले, "हे एकूण मी त्यांनी म्हणतो, काय? अग साडेबारा वाजलेत. नाही सर आम्ही जाऊ. अग शेवटची लोकल साडे अकरा वाजताची होती. मग त्या सांगतात, नाही सर आम्ही मध्ये कोणाच्या तर घरी थांबणार आहोत. किंवा आम्ही उबर करू, तुम्ही नका काळजी करू."

वैभव जोशी यांनी सांगितलं, "मग अशा वेळी मी तिथे खाली माझा नंबर लिहितो. पोहोचल्यावर व्हॉट्स एप कर किंवा इन्स्टाला DM करायला सांगतो, मग ओळख असूदेत किंवा नसूदेत. असं सगळ्यांच्या बाबतीत होतंय. हे जरा जास्त होतं पण आता काय करणार." वैभव जोशी यांच्या या कृतीतून त्यांचं चाहत्यांवर असलेलं प्रेम आणि काळजी दिसून येते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सहीसोबत देतात स्वतःचा नंबर, 'मन तुझं जलतरंग' फेम वैभव जोशी यांनी सांगितलं यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल