TRENDING:

Maharastra Election 2024: मराठी मालिकांच्या शुटींगला 'ब्रेक'; पण कारण काय? 

Last Updated:

No Shooting of Marathi Serials on Voting Day, Maharastra Election 2024 : मालिकांचं शुटींग हे सलग सुरू असतं. महिन्यातील जवळपास 25 दिवस कलाकार मालिकांचं शुटींग करत असतात. त्यांना फारशा सुट्ट्या मिळत नाहीत. पण या सगळ्या कलाकारांना आणि त्याबरोबर मालिकेत पडद्यामागे काम करणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञांना ब्रेक मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टेलिव्हिजनवर अनेक आशयांच्या आणि विषयांच्या मालिका सध्या सुरू आहेत. फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मराठी मालिकांचं शुटींग सुरू आहे. टेलिव्हिजनवर सध्या आई कुठे काय करते या मालिकेची चर्चा आहे. या मालिकेने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की मराठी मालिकांच्या शुटींगला ब्रेक लागणार आहे. मालिकांचं शुटींग थांबणार आहे. पण का? काय आहे यामागचं कारण?
मराठी मालिका
मराठी मालिका
advertisement

मालिकांचं शुटींग हे सलग सुरू असतं. महिन्यातील जवळपास 25 दिवस कलाकार मालिकांचं शुटींग करत असतात. त्यांना फारशा सुट्ट्या मिळत नाहीत. पण या सगळ्या कलाकारांना आणि त्याबरोबर मालिकेत पडद्यामागे काम करणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञांना ब्रेक मिळणार आहे. हा ब्रेक मतदानासाठी असणार आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मालिकेतील कलाकारा, तंत्रज्ञ आणि अन्य लोकांना एक दिवसाची शुट्टी देण्यात आली आहे.

advertisement

मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई

अनेक मालिकांचं शुटींग हे मुंबईबाहेर सुरू आहे. त्यामुळे त्यांना मतदानासाठी आपल्या आपल्या शहरात पाठवण्यासाठी आलं आहे. तर काही मालिकांचे शुटींग हे मुंबईत आहेत. त्या मालिकेची टीम मतदान करून दुपार नंतर शुटींग करणार आहेत.

'थोडं तुझं आणि थोडं माझं', 'येड लागलं प्रेमाचं', 'उदे गं अंबे', 'अबोली', 'जय जय स्वामी समर्थ', 'इंद्रायणी', 'पिंगा गं पोरी', 'अप्पी आमची कलेक्टर', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवरी मिळे हिटरला' अशा काही मालिकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर 'गाथा नवनाथांची', 'लाखात एक आमचा दादा', 'शिवा', 'सावळ्यांची जणू सावली' या मालिकांचं चित्रीकरण दुपारनंतर होणार आहे. तर गाथा नवनाथांची' या मालिकेचं शुटींग सकाळी 7-8 वाजल्यापासून सुरू होतं. पण मतदानाच्या दिवशी चित्रीकरणाचा 'कॉल टाइम' 11 वाजताचा ठेवण्यात आला आहे.

advertisement

त्याचप्रमाणे कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे असतं. मालिकेतले सगळेच कलाकार- तंत्रज्ञ नाशिकचे नाहीत. त्यामुळे मतदान करण्यासाठी त्यांना आपापल्या शहरात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत शुटींग करणारे बरेचसे कलाकार मुंबईबाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांनाही मतदानाच्या दिवशी एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

advertisement

Gulabi Movie: मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई

मराठी बातम्या/मनोरंजन/
Maharastra Election 2024: मराठी मालिकांच्या शुटींगला 'ब्रेक'; पण कारण काय? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल