TRENDING:

Allu Arjun: झुकेगा नहीं...! पण पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला; 4 तासांत अल्लू अर्जुनसोबत काय घडलं?

Last Updated:

Allu Arjun: 'पुष्पा 2' प्रिमिअरवेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणी अल्लू अर्जुन सध्या निशाण्यावर आहे. त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पहायला मिळत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'पुष्पा 2' प्रिमिअरवेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणी अल्लू अर्जुन सध्या निशाण्यावर आहे. त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पहायला मिळत आहेत. या प्रकरणात काल अल्लू अर्जुनची चौकशी झाली. यावेळी अल्लू अर्जुन भावूक झाल्याचं समोर आलंय.
पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला
पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला
advertisement

अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांसह सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. दुपारी 2.45 वाजता ते पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. सुमारे चार तास चाललेल्या चौकशीदरम्यान, पोलिसांनी अभिनेत्याला काही प्रश्न विचारले, व्हिडीओ दाखवण्यात आले यादरम्यान तो भावूक झाला.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना, आता 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकानेच घेतला मोठा निर्णय!

advertisement

डीसीपी अक्षांश यादव यांच्यासह पोलिसांच्या पथकाने अल्लू अर्जुनची चौकशी केली. चौकशीदरम्यान अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दलही विचारण्यात आले आणि बाऊन्सर्सनी त्याच्या चाहत्यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी सांगितले की, अभिनेत्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आणि गरज पडल्यास ते त्यांना पुन्हा कॉल करतील.

advertisement

चेंगराचेंगरीचा व्हिडिओ पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला. गुलटे यांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन चौकशीदरम्यान भावूक झाला होता. 'पुष्पा 2' अभिनेत्याची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली आणि संध्या थिएटरमधील 'पुष्पा 2' प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. व्हिडिओ पाहताना, श्रीतेज आणि रेवती जखमी झाल्याचे दृश्य पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला.

Pushpa 2 Stampede Case : अल्लू अर्जुनची पोलिसांकडून चौकशी, 2 तासात विचारले 'हे' 8 प्रश्न

advertisement

दरम्यान, 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला, त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि 14 डिसेंबरला सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: झुकेगा नहीं...! पण पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला; 4 तासांत अल्लू अर्जुनसोबत काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल