6 जानेवारी 2024 रोजी समीक्षा अचानक घरातून निघून गेली. ती रात्रीच्या ट्रॅव्हल्सने थेट सुरतला पोहोचली. पण प्रत्यक्षात आकाशच्या आयुष्याची वास्तविकता वेगळीच होती. तो एका छोट्या चाळीत राहात होता, आई-वडील दोघांचेही निधन झालेले. तो एका कंपनीत फक्त ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. समीक्षाला पहिल्या भेटीतच धक्का बसला, पण पळून आल्याने परत कसे जायचे हा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने आकाशसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
तिकीट काढले अन् सगळेच घाबरले, धावत्या बसमध्ये महिलेचं टोकाचं पाऊल, त्या कृतीने खळबळ
दुसरीकडे, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याचा गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला अपहरणाचा संशय घेऊन तपास सुरू झाला, पण तीन महिन्यांत काहीच हाती न लागल्याने प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले. सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचोळकर, पुनम परदेशी आणि रामदास गव्हाणे यांच्या पथकाने सातत्याने तिच्या शोधासाठी प्रयत्न केले.
समीक्षाला कुटुंबाची आठवण येऊ लागली. तिने इन्स्टाग्रामवर निनावी अकाउंट तयार करून आपल्या भावाशी संपर्क साधला. ती नेहमी पालकांबद्दल विचारणा करायची, ज्यामुळे भावाला शंका आली. त्याने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून प्रोफाइल समीक्षाचेच असल्याचे निश्चित केले आणि त्यावर पाळत ठेवली.
अखेर 23 ऑक्टोबरला भाऊबीजेच्या निमित्ताने समीक्षा आणि आकाश शहरात येऊन भावाला भेटण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तात्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. अपहरणाच्या गुन्ह्यात आकाशला अटक करण्यात आली, तर समीक्षाला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.






