2016 पासून अविरतपणे हे अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार, फुले, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा इतर नाशवंत वस्तूंनी अभिवादन करण्यापेक्षा एक वही एक पेन देऊन अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात येते. तसेच जमा झालेले वही पेन हे दुर्बल घटक आहेत ज्यांना खरंच याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना दिले जाते. चार राज्यांमध्ये आणि 22 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो.
advertisement
तो दिवस मोठा कठीण होता, परिस्थिती बिघडली असती तिथेच…जालन्यातील कारसेवकांनी सांगितला तो थरारक अनुभव
10 ते 11 वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास दीड लाखाच्या वरती वह्या आणि पेन संकलन केले आहे. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ज्यांना खरोखरच गरज आहे. अशा दुर्गम भागात जाऊन आम्ही हे वही आणि पेनाचे वाटप करत असतो. फुल हारापेक्षा जर तुम्ही वही आणि पेन या ठिकाणी दिलं तर नक्कीच त्याचा समाजामध्ये उपयोग होईल, असे उपक्रमासाठी पुढाकार घेणारे शेखर निकम सांगतात.





