परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबीयांचे निर्वहण करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुले-बाळे व कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे. ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसेच त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संरक्षण व स्थैर्य याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावीत केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मुंडे म्हणाले.
advertisement
गणेशच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डोंगरे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे करून त्यासंबंधी पाठपुरावा करेन, असे धनंजय मुंडे म्हणाले.
