छत्रपती संभाजीनगर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरु असताना हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे चर्चा आहे. या हल्ल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून अतुल सावे आणि शिरसाटांच्या गुंडानी हल्ला केल्याला त्यांनी आरोप केला आहे.
advertisement
संभाजीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात इम्तियाज जलील यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इम्तियाज जलील हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. जलील म्हणाले, हा हल्ला भाजप मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या गुंडांनी केला आहे. हे गुंड भाड्याने पाठवण्यात आले होते. मात्र त्यांच्या या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही.
इम्तियाज जलील यांनी कोणाची नावे घेतली?
माझ्यावर कोणी हल्ला केला हे आम्हाला सगळं माहीत आहे. संभाजीनगरमधील पदयात्रेला मी रीतसर परवानगी घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि दोषींवर कारवाई करा, आमची सगळी तयारी करा, गुंडगिरी करायची असेल तर आम्हाला कमी समजू नका. आम्ही गप्प बसणारे नाही. कलीम कुरेशी याचे नंबर दोनचे धंदे आहे. कलीम कुरेशी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी हे सगळं घडून आणले आहे . मी पैसे घेऊन कोणालाही तिकीट दिले नाही, असेही जलील म्हणाले.
इम्तियाज जलील यांचा थेट इशारा
आम्ही गप्प बसणारे नाहीत त्यांना राडा करायचा असेल तर आम्ही उत्तरे देऊ. त्यांना असं वाटलं होतं आमची रॅली थांबवू पण रॅली थांबणार नाही. गुंडगिरी तुम्हाला करायची असेल तर आम्हालाही कमी समजू नका. आम्हाला शांततेत निवडणूक लढायची आहे, असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
नेमकं काय झालं?
छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुऱ्यात एमआयएम चे कार्यकर्ते आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. एम आय एम कार्यकर्ते आणि नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला असून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.
