गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झालीये. मराठा आरक्षण उपसमितीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना सरकारच्या निर्णयांबदद्ल माहिती दिली. गुलाल उधळत, आनंद साजरा करत मुंबई सोडणार असल्याची घोषणाही मनोज जरांगेंनी केली. आरक्षणाची लढाई मराठ्यांनी जिंकली अशी घोषणा करताना मनोज जरांगेनी या आंदोलनाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावक मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले,माणिकराव कोकाटे,उदय सामंत, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सरकारकडून हैदराबाद गॅजेटच्याअंमलबजावणीला मान्यता देण्यात आली, त्यावेळी जरांगेंनी सगळ्यांचे आभार मानले मात्र प्रताप सरनाईकांना टोला लगावला, यावेळी मोठा हशा पिकला.
advertisement
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
सरनाईक साहेब तुम्ही आमच्या गाड्यांवर मोठा दंड लावला आहे, जर माफ नाही केला तर तुम्हाला आमच्या तिथून धाराशिवला जाऊ देणार नाही, असा टोला मनोज जरांगेनी लगवताच मंचावर हशा पिकला आणि मैदानात उपस्थित आंदोलकांनी दाद दिली. माझी एक इच्छा आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावे... तुमचं आमचं वैर संपले.
जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य
जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळालंय. आरक्षणाची लढाई जिंकल्यानं आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनंही हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाचा जीआर काढलाय. मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं जीआर काढलाय. जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील दोन वर्षांपासून सातत्यानं केली होती. मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं होतं. अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलंय.
हे ही वाचा :