संचार बंदी पूर्णपणे कुठे उठवली?
18 मार्च रोजी रात्री सुरू झालेली संचारबंदी आज 20 तारखेच्या दुपारपासून म्हणजे आजपासून दुपारी 2 वाजल्यापासून नंदनवन आणि कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठिकाणांवरील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात येत आहे. संचार बंदी पूर्णपणे उठवल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
चार तासांची शिथिलता कुठे?
शांतीनगर, पाचपावली, लकडगंज , सक्करदरा, इमामवाडा, या भागात दैनंदिन जीवनात लोकांच जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आढावा घेऊन आज पासून दोन वाजता पासून सायंकाळी 6 पर्यंत चार तासाकरिता शिथीलता देण्यात आली आहे. या भागातील संचार बंदीत 4 तासाची शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
संचार बंदी कुठे कायम?
कोतवाली, तहसील आणि गणेश पेठ या भागात हिंसाचार झाला होता. त्यामुळे या पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशास तसा सुरू राहणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
