TRENDING:

आठवणीना उजाळा! रेल्वे रोखून बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतलं होतं वास्तूच उद्घाटन, सोलापुरातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

शंकरराव रिकिबे यांनी बांधलेल्या वास्तूचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते व्हावे, यासाठी शंकरराव रिकिबे यांनी रेल्वे थांबवून त्या वास्तूचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोलापूर जिल्ह्यात अनेक वेळा आगमन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसरे गावाला देखील पदस्पर्श झाला आहे. शंकरराव रिकिबे यांनी बांधलेल्या वास्तूचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते व्हावे, यासाठी शंकरराव रिकिबे यांनी रेल्वे थांबवून त्या वास्तूचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतले. कुर्डुवाडी गावात राहणारे अर्जुन साधू गाडे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement

कुर्डूवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर भोसरे या गावात राहणारे शंकरराव रिकिबे त्या काळात एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव यांचे घनिष्ठ संबंध होते. ज्या-ज्या वेळेस बाबासाहेब या भागात सभा, मिटिंग घेत होते, त्याचे नियोजन, व्यवस्था शंकरराव रिकिबे करत होते. बाबासाहेब या ठिकाणी आल्यावर आवर्जून शंकरराव रिकिबे यांना बोलावून घेत असत.

advertisement

Dr. Babasaheb Ambedkar Home: मुंबईत जपलाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा, एकदा तरी अवश्य भेट द्या

शंकरराव रिकिबे यांचे शेत भोसरे गावा लगत असून या शेतामध्ये दोन मजली इमारत बांधावी आणि एक विहीर बांधावी अशी इच्छा शंकररावांनी बाबासाहेबांसमोर व्यक्त केली. शंकरराव रिकिबे यांनी बाबासाहेबांसमोर सांगितलेली इच्छा खरी करून दाखवली आणि दोन मजली इमारत आणि विहीर बांधली. शंकररावांनी बांधलेल्या या दोन्ही वास्तूंच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांना निरोप दिला.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाचे तांडव ते चर्चेचा विषय ठरलेला बिबट्या, पुण्यात इथं भरलंय चित्र प्रदर्शन
सर्व पहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. शंकरराव यांनी बांधलेले घर आणि विहीर ही रेल्वे मार्गांपासून 50 मीटर अंतरावर होती. ज्यावेळेस रेल्वे या ठिकाणी आली, तेव्हा शंकररावांनी अनधिकृतपणे रेल्वेगाडी थांबवून बाबासाहेबांना रेल्वेतून खाली उतरवून घेतले आणि बांधलेल्या वास्तूचे 1937 साली उद्घाटन करून घेतले. रेल्वे गाडी अनधिकृतपणे थांबवून घेतल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्याने त्यांच्यावर दंड ठोठावला, अधिकाऱ्याने ठोठावलेला दंड शंकररावांनी जमा देखील केला. पंढरपुरात सुद्धा शंकरराव रिकिबे यांचा रिकिबे वाडा सुद्धा आहे आणि या वाड्याचे सुद्धा उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करून घेतले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आठवणीना उजाळा! रेल्वे रोखून बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतलं होतं वास्तूच उद्घाटन, सोलापुरातील हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल