स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे अंधारात जीवन जगल्यानंतर गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच घराघरात दिवे लागले. महावितरणने गावात 63 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला असून त्यामुळे प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. याआधी ग्रामस्थांना केवळ कंदील आणि चुलीच्या प्रकाशावरच काम भागवावे लागत होते. आता मात्र घरकाम, मुलांचे अभ्यास आणि रात्रीचा प्रवास या सगळ्यांसाठी मोठी सोय झाली आहे.
advertisement
आदिवासी भागात असलेल्या वारसवाडी गावात 60 जण राहतात. गावातील रस्त्यांवरही पहिल्यांदा दिवे लागल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गावात वीज आल्याचा आनंद ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. फटाके फोडले, एकमेकांना मिठ्या मारल्या आणि हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Electricity: महाराष्ट्रातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली वीज, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी