मालवाहू गाडीचं इंजिन बिघडल्याने अंबरनाथ-कर्जत रेल्वे मार्गावरील उपनगरी आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांवर झाला असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विलंब सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा देखील रखडली आहे. प्रवाशांचा मनस्ताप लक्षात घेता मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून त्याचा फायदा प्रवाशांना आणि गणपतीचं दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना होणार आहे.
प्रवाशांना एक्सप्रेसमधून प्रवासाची परवानगी
advertisement
रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांमधून प्रवाशांना पर्यायी सोय उपलब्ध करून देण्यासाठी एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे गाड्या उशिरा धावत असल्या तरी प्रवाशांना प्रवास सुलभ होईल, असा रेल्वेचा दावा आहे.
Manoj Jarange Live update: मनोज जरांगे यांचा ताफा चेंबूरमध्ये दाखल, प्रचंड वाहतूक कोंडी
घटनास्थळी दुरुस्तीचे प्रयत्न
मालगाडीचे इंजिन रुळांवरच थांबल्याने मागील गाड्यांचा क्रम मोडला आहे. घटनास्थळी तांत्रिक पथक पोहोचले असून इंजिन दुरुस्त करून गाडी मार्गस्थ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिस्थिती लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.
सकाळपासून गाड्या उशिरा
सकाळपासून या मार्गावरील उपनगरी गाड्या उशिरा धावत असून कर्जत, बद्दलापूर आणि अंबरनाथसह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.