TRENDING:

Mumbai Dam Water Storage: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, सातही धरणे काठोकाठ भरली

Last Updated:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुबलक आणि समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुबलक आणि समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट ओढवणार नाही, तर उलट 24 तास पाणीपुरवठा निर्विघ्न सुरू राहील, अशी खात्री आता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

धरणांमध्ये 99.46 टक्के साठा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व धरणांत मिळून एकूण 14 लाख 39 हजार 588 दशलक्ष लिटर पाणी साठले आहे. ही क्षमता म्हणजेच 99.46 टक्के इतकी होते. सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी आहे. या जलसाठ्यातून मुंबईला रोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

advertisement

Godavari Flood: गोदामाय कोपली, जालन्यात 10 हजार नागरिकांना सोडावं लागलं घर, PHOTOS

कोणती धरणे किती भरली?

तुळशी धरण – 100%

विहार धरण – 100%

तानसा धरण – 91.91%

मोडकसागर धरण – 100%

अप्पर वैतरणा धरण – 99.58%

मध्य वैतरणा धरण – 98.96%

भातसा धरण – 99.35%

यातील तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित तीन धरणेही जवळपास शंभर टक्के क्षमतेच्या जवळ पोहोचली आहेत.

advertisement

गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक समाधानकारक स्थिती

गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये 99.44 टक्के पाणी साठा होता. यंदा तो 99.46 टक्के इतका आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. विशेष म्हणजे, यावर्षी पावसाळ्यात महापालिकेकडून पाणीकपात लागू करण्यात आलेली नव्हती.

1 ऑक्टोबरची महत्त्वाची तारीख

महापालिकेच्या नियमांनुसार, जर 1 ऑक्टोबरला धरणांमध्ये शंभर टक्के साठा असेल तर पुढील पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ती स्थिती पूर्ण समाधानकारक मानली जाते. यंदा सर्व धरणांत साठा जवळपास शंभर टक्के असल्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

advertisement

पाणीपुरवठा सुरळीत

सध्या मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या साठ्यामुळे ही व्यवस्था अव्याहत सुरू राहणार आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई किंवा कपातीची चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट महापालिकेने केले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Dam Water Storage: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, सातही धरणे काठोकाठ भरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल