अवेज पुढे म्हणाला की,"जर मी काही चूक केली असेल तर मी पुन्हा घरात जाईन आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन. मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. जर मी काही चूकच केलेली नसेल, तर घराबाहेर आल्यावर मी का घाबरू? जेव्हा गौहरने मला रिअॅलिटी चेक दिला, तेव्हाही घरातले लोक माझ्याबद्दल बोलत होते. लोकांना वाटत होतं की मी त्यांना उत्तर द्यावं. आता मला गेम खेळायचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना माझ्या इव्हिक्शनमुळे खूपच धक्का बसला होता".
advertisement
'जबरदस्ती घेऊन गेले...', झुबीन गर्गच्या बायकोचा खळबळजनक खुलासे, गायकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं
लवकरच करणार आहेत निकाह
अवेज दरबारच्या आधी त्याची गर्लफ्रेंड घरातून बेघर झाली होती. त्यानंतर अवेजलाही कमी वोट्समुळे घराबाहेर जावे लागले. ‘बिग बॉस 19’मध्ये अवेजच्या गेमबाबत बोलायचं झालं, तर तो सुरुवातीपासूनच एक कमजोर खेळाडू म्हणून ओळखला जात होता. सलमान खानसह घरातले सदस्यही त्याच्या गेम प्लानला नेहमीच सर्वात कमजोर कंटेस्टंट म्हणून मानत होते. विशेष म्हणजे, अवेज आणि नगमाने शोमध्ये हे ठरवले होते की ते लवकरच निकाह करणार आहेत.
