TRENDING:

Pitru Paksha 2024: पितृ पक्षात पितरांसाठी हे शुभ काम केल्यास मिळतील विशेष आशीर्वाद

Last Updated:

18 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? श्राद्ध विधीच्या वेळी पितरांना कोणत्या वस्तू दान करतात ते जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून पूजा केली जाते. पितृ पक्षात पितरांप्रती आदर व्यक्त केला जातो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते. यावर्षी 18 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत असून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. शास्त्रानुसार, श्राद्ध पक्ष भाद्र महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीपर्यंत चालतो.
पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? श्राद्ध विधीच्या वेळी पितरांना कोणत्या वस्तू दान करतात ते जाणून घेऊया.
पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? श्राद्ध विधीच्या वेळी पितरांना कोणत्या वस्तू दान करतात ते जाणून घेऊया.
advertisement

असे मानले जाते की मृत्यूचे देवता यमराज श्राद्ध पक्षाच्या वेळी पितरांना मुक्त करतात, जेणेकरून ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन अन्न ग्रहण करू शकतात. पितृपक्षात पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

पितृ पक्षात, कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण श्रद्धेने केले जाते, याला श्राद्ध म्हणतात. पिंडदान करणे म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना अन्नदान करणे. तर्पण करण्याचा अर्थ असा आहे की आपण पाणी दान करत आहोत. पितृ पक्षात तीन कामांना महत्त्व देण्यात आले आहे. पितृ पक्षाच्या काळात गायींना हिरवे गवत आणि गोठ्यात पैसे दान करावेत. यासोबतच घराच्या छतावर कावळ्यांसाठी अन्नही ठेवावे. गरजू लोकांना अन्नदान करावे. मंदिरात पूजा साहित्य अर्पण करावे. या दिवसांत भागवत गीतेचे पठण करावे.

advertisement

असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपले पूर्वज पशु-पक्ष्यांच्या रूपात आपल्या जवळ येतात अन्न ग्रहण करतात.

श्राद्धाच्या वेळी पितरांसाठी अन्नाचा काही भागही काढला तरच श्राद्ध विधी पूर्ण होतो. श्राद्ध करताना पितरांना अर्पण केलेल्या अन्नातील पाच भाग गाय, कुत्रा, मुंगी, कावळा आणि देवांसाठी काढले जातात. असे मानले जाते की कुत्रा हे जल तत्वाचे, मुंगी हे अग्नि तत्वाचे, कावळा हे वायु तत्वाचे, गाय हे पृथ्वी तत्वाचे आणि देव हे आकाश तत्वाचे प्रतिक आहे. अशाप्रकारे या पाच जणांना अन्नदान करून पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. फक्त गायीमध्ये पाच घटक एकत्र आढळतात. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात गायीची सेवा करणे विशेष फलदायी मानली जाते.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pitru Paksha 2024: पितृ पक्षात पितरांसाठी हे शुभ काम केल्यास मिळतील विशेष आशीर्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल