या मराठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी काढलं होतं घराबाहेर; चव्हाट्यावर आले कौटुंबिक वाद; काय होतं कारण?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
या अभिनेत्रीनं लवकरच लग्नगाठ बांधत आयुष्यात सेटल होण्याचा निर्णय घेतला. पण या अभिनेत्रीचे कौटुंबिक वाद अनेकदा चव्हाट्यावर आले होते. वर्षा उसगावकर यांच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं जाणून घ्या.
advertisement
1/9

मराठी मनोरंजनसृष्टीती दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. वर्षा यांनी मराठी सोबतच बॉलिवूडवर राज्य केलं. 90 च्या दशकात त्यांनी एक सो एक हिट सिनेमे दिले.
advertisement
2/9
आजही ही अभिनेत्री चिरतरुण दिसते. त्यांचं सौंदर्य आजही अनेकांना मोहात टाकतं. या अभिनेत्रीनं लवकरच लग्नगाठ बांधत आयुष्यात सेटल होण्याचा निर्णय घेतला. पण या अभिनेत्रीचे कौटुंबिक वाद अनेकदा चव्हाट्यावर आले होते. वर्षा उसगावकर यांच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं जाणून घ्या.
advertisement
3/9
वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून करिअरची सुरुवात केली होती, त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचा पहिला चित्रपट 'गम्मत जम्मत' 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता.
advertisement
4/9
त्यानंतर वर्षा यांनी 1988 मध्ये बीआर चोप्रा यांची लोकप्रिय मालिका 'महाभारत' मध्ये उत्तरा ही भूमिका साकारली होती. यानंतर त्यांच्या अभिनयाची सगळीकडेच चर्चा झाली.
advertisement
5/9
त्यानंतर काही वर्षातच वर्षा यांनी 1991 मध्ये 'दूध का कर्ज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रजनीकांत, नाना पाटेकर तसेच मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करत प्रसिद्धी मिळवली.
advertisement
6/9
करिअरच्या शिखरावर असताना वर्षा उसगावकर यांनी 2000 मध्ये संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मासोबत लग्नगाठ बांधली. पण त्यानंतरच त्यांचं सासऱ्यांसोबतच भांडण चर्चेत आलं.
advertisement
7/9
काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या सासरच्या लोकांनी वर्षा आणि त्यांच्या पतीला संपत्तीतून पूर्णपणे बेदखल केलं होतं. वर्षाच्या सासऱ्यांनी त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीत कुठलाच वाटा दिला नव्हता. यामुळंच वर्षा यांना सासऱ्यांनी घराबाहेर काढल्याचं बोललं जातं.
advertisement
8/9
2012 मध्ये जेव्हा वर्षा यांचे सासरे रविशंकर शर्मा यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी पतीच्या बहिणींना दोष दिला, एवढचं नाही तर तिच्या पतीच्या बहिणींनी सर्व मालमत्ता हडप केल्याचा दावा अभिनेत्रीनं केला होता.
advertisement
9/9
पण नंतर तपास केला असता रविशंकर शर्मा यांनी अजय आणि वर्षा यांना त्यांच्या मृत्यूपत्रात कोणताही हिस्सा दिला नसल्याचं समोर आले. म्हणजे त्याने संपूर्ण मालमत्ता आपल्या मुलींच्या नावावर केली होती. त्यांनी मृत्युपत्रात स्पष्टपणे, 'त्यांचा मुलगा आणि सून यांचा माझ्या प्रॉपर्टीत कुठलाही संबंध नसल्याचं' सांगितलं होतं. याच वादामुळं वर्षा चर्चेत आल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
या मराठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी काढलं होतं घराबाहेर; चव्हाट्यावर आले कौटुंबिक वाद; काय होतं कारण?