काजू कितीही असले पौष्टिक तरी ठरतात घातक, 'असे' खाल्ले तर जडतील किडनी, फुप्फुस आणि हृदय रोग!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
काजू आवडत नाही, अशी व्यक्ती कदाचित शोधूनही सापडणार नाही. कच्च, भाजलेलं, मिठाईत, जेवणात घातलेलं, असं कोणत्याही प्रकारे खाल्लं तरी काजू भारीच लागतं. विशेषतः थंडीत लोक जास्तीत जास्ती काजू खातात कारण ते गरम असतात. अनेकजण तर आपल्या दिवसाची सुरुवातच काजू-बदाम खाऊन करतात. परंतु तुम्हाला माहितीये का, काजूपासून शरिराला भरपूर पौष्टिक तत्त्व मिळतातच पण ते आरोग्यासाठी घातकही असतात.
advertisement
1/5

फिटनेस फ्रिक लोक आपल्या दिवसाची सुरूवात व्यायामाने करतात. शिवाय काजू आणि बदामही खातात. काजूतून शरिराला अनेक पोषक तत्त्व मिळतात.
advertisement
2/5
काजूमुळे शरिराला फायदेच फायदे होतात एवढंच आपल्याला माहित असतं. मात्र फार कमी लोक जाणतात की, काजू आरोग्यासाठी घातकही असतात. काजूमुळे स्थूलपणा, डोकेदुखी, पोटाचे विकार, मुतखडे आणि फुप्फुसांशी संबंधित आजार शरिराला जडू शकतात.
advertisement
3/5
उत्तराखंडचे डॉक्टर रजत सांगतात की, काजूमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतात यात काही शंका नाही. शिवाय काजूमुळे शरिरातली साखर नियंत्रणात राहते, केस आणि हाडं मजबूत होतात. मात्र हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा आपण काजू प्रमाणात खातो. प्रमाणाबाहेर खाल्ल्यास डोकं दुखतं आणि शरीर स्थूल होतं.
advertisement
4/5
कॅल्शियम, फायबरसह काजूमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कोलेस्ट्राॅल असतं. जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास शरिरात आयर्न जमा होतं. जर हे आयर्न फुप्फुसात जमा झालं तर दम्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय कोलेस्ट्राॅमुळे हृदयरोगाचा धोका असतो.
advertisement
5/5
काजूमुळे त्रास होतो म्हणून ते खाणं सोडू नका. ते प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला फायदाच होईल. शिवाय याबाबात तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर उत्तम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
काजू कितीही असले पौष्टिक तरी ठरतात घातक, 'असे' खाल्ले तर जडतील किडनी, फुप्फुस आणि हृदय रोग!