Shravan 2024: श्रावणात उपवासानं येणार नाही अशक्तपणा; फक्त आहारात समावेश करा या पदार्थांचा
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असतो. अनेक महिला या काळात उपवास करतात. सोळा सोमवार, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, तसंच गोकुळाष्टमी, नागपंचमी या दिवशी अनेक महिला उपवास करतात. सततच्या उपवासानं थकवा येऊ शकतो, काही गंभीर समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच उपवास केला तरी शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करता येऊ शकतो.
advertisement
1/8

या महिन्यात अनेक जण उपवास करतात. काही जण केवळ सोमवार, शनिवारी उपवास करतात, तर काही जण संपूर्ण महिनाभर उपवास करतात.उपवासाचे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. त्यामुळे अधूनमधून उपवास करणं चांगलं असतं; मात्र काही जणांना उपवासामुळे चक्कर येणं, अशक्तपणा येणं अशा समस्या जाणवतात. त्याचं कारण उपवासाच्या फराळात ऊर्जादायी पदार्थांचा समावेश ते करत नाहीत.
advertisement
2/8
उपवासावेळी आपलं शरीर बराच काळ आरामदायी अवस्थेत असतं. त्यामुळे डिटॉक्स प्रक्रिया सुरू करण्याचे आणि आपली आतडी स्वच्छ करण्याचे संकेत पचनशक्तीला दिले जातात. त्यामुळे उपवास करणं चुकीचं नसून केवळ या काळात ऊर्जादायी आहार घेतला तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही.
advertisement
3/8
खिचडी उपवास असताना गहू व तांदूळ खाल्ले जात नाहीत; पण कुट्टूचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, वरी तांदळाचं पीठ वापरता येऊ शकतं. या पीठांपासून पुऱ्या, वडे, भजी करण्यापेक्षा खिचडी किंवा पोळी करून खावी. त्यातल्या कर्बोदकांमुळे भरपूर ऊर्जा मिळते.
advertisement
4/8
उकडलेले बटाटेउपवासाला बटाट्याचे पापड, पापड्या असे तळून केलेले पदार्थ खाण्यापेक्षा उकडलेला बटाटा खाणं अधिक आरोग्यदायी ठरू शकतं. कारण तळल्यामुळे ते पदार्थ शरीरासाठी घातक ठरतात व सुस्ती वाढवतात.
advertisement
5/8
फळंउपवास असताना भरपूर फळं खावीत. फळांमधून जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर्स मिळतात. तसंच दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
advertisement
6/8
कंदउपवास असताना बटाटा, रताळं, अरबी, सुरण अशा कंद भाज्या खाल्ल्या जातात. हा एक चांगला पर्याय आहे. यात ब जीवनसत्त्व, खनिजं आणि फायबर्स भरपूर असतात.
advertisement
7/8
दूध व दुग्धजन्य पदार्थशरीराची प्रथिनांची व कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ खाता येऊ शकतात. त्यामुळे उपवास असताना आहारात दूध, दही, ताक, पनीर, तूप या पदार्थांचा समावेश करावा. यंदाच्या श्रावणात उपवास करताना आहारात या पदार्थांचा समावेश केला तर अशक्तपणा येणार नाही व उपवासाचा फायदाही होईल.
advertisement
8/8
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shravan 2024: श्रावणात उपवासानं येणार नाही अशक्तपणा; फक्त आहारात समावेश करा या पदार्थांचा