TRENDING:

Hariyali Teej 2025: लग्नाची चिंता मिटवा! हरियाली तीजला करा 'हे' उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार!

Last Updated:
Hariyali Teej 2025: हरियाली तीजला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित वरासाठी हे व्रत करतात. या दिवशी भगवान...
advertisement
1/6
लग्नाची चिंता मिटवा! हरियाली तीजला करा 'हे' उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार!
सनातन धर्मात हरियाली तीजच्या उपवासाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवी पार्वती आणि भगवान शंकराचा उपवास करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विधीनुसार पूजा करावी. भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करावा.
advertisement
2/6
असं म्हणतात की, यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच वैवाहिक जीवन आनंदी होतं. हरियाली तीजच्या दिवशी लग्नात काही अडचण येत असेल किंवा विलंब होत असेल किंवा काही अडथळे येत असतील, तर काही खास उपाय केल्याने त्यापासून मुक्ती मिळू शकते, चला तर मग सविस्तरपणे समजून घेऊया...
advertisement
3/6
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी हरियाली तीज 27 जुलै रोजी साजरी केली जाईल. अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 26 जुलै रोजी रात्री 10 वाजून 41 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 जुलै रोजी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी संपेल. लग्नात काही अडथळा येत असेल, तर या दिवशी भगवान शंकर आणि माता लक्ष्मीशी संबंधित काही विशेष उपाय नक्की करावेत.
advertisement
4/6
हरियाली तीजच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान शंकराला नारळ अर्पण करावा. असे केल्याने भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विशेष आशीर्वाद मिळतो.
advertisement
5/6
जर तुमचं लग्न होत नसेल आणि विवाहात अडथळे येत असतील, तर अशा परिस्थितीत हरियाली तीजला स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. शिव-शक्तीची पूजा करावी. भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा. माता पार्वतीला कुंकू-सिंदूर अर्पण करावं आणि त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीला लवकर लग्नासाठी प्रार्थना करावी. असं केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात.
advertisement
6/6
याशिवाय, हरियाली तीजच्या दिवशी भगवान शिवाला पांढरी फुलं अर्पण करावीत. पूजेदरम्यान फक्त अखंड तांदूळ आणि गुळापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा. असं केल्याने कुंडलीत शुक्र मजबूत होतो आणि लवकर साखरपुडा आणि विवाहाची शक्यता निर्माण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Hariyali Teej 2025: लग्नाची चिंता मिटवा! हरियाली तीजला करा 'हे' उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल