Chanakya Niti : बायकोला खूश कसं करायचं? चाणक्य यांनी सांगितला सोपा फंडा
- Published by:Priya Lad
Last Updated:
लग्न झाल्यानंतर पत्नीला काय हवं नको ते पाहण्याची जबाबदारी पतीची असते. पत्नीला खूश कसं करायचं ते आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
1/5

लग्न झाल्यानंतर पत्नीला काय हवं नको, तिच्या सुखाची काळजी ही पतीची जबाबदारी. पत्नीसाठी काय करायचं, तिला खूश कसं ठेवायचं, यासाठी पती काय काय नाही करत. पण पत्नीला खूश करण्याचा सोपा मार्ग आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगितला आहे.
advertisement
2/5
‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।। चाणक्यनीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख आहे, जे महिलांना आवडतात.
advertisement
3/5
चाणक्यनीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रती प्रामाणिक असतो, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
advertisement
4/5
शांत, सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जडतो. महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात. पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात.
advertisement
5/5
आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही. महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल, त्यांचं सर्व ऐकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : बायकोला खूश कसं करायचं? चाणक्य यांनी सांगितला सोपा फंडा