Tirupati Balaji Temple : का बंद असतात तिरुपति बालाजीच्या मुर्तीचे डोळे? 99 टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Tirupati Balaji Temple : तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल की भगवान व्यंकटेश्वराचे डोळे नेहमी बंद असतात, पण असं का? कधी विचार केलाय?
advertisement
1/5

तिरुपती बालाजी हा भगवान विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. जोपर्यंत भगवान व्यंकटेश्वर कलियुगात आहेत तोपर्यंत कलियुग संपू शकत नाही, असेही म्हटले जाते. तिरुपति बालाजीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण या मंदिरातील व्यंकटेशाच्या मुर्तीबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल.
advertisement
2/5
तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल की भगवान व्यंकटेश्वराचे डोळे नेहमी बंद असतात, तर इतर मंदिरातील देवी-देवतांचे डोळे हे बंद नसतात. अशा स्थितीत तिरुपती बालाजीचे डोळे का मिटलेले आहेत असा प्रश्न उपस्थीत रहातो.
advertisement
3/5
हे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमाला या डोंगरी शहरामध्ये आहे. वेंकटेश्वर, भगवान श्री हरीचा अवतार, ते त्यांच्या शक्तिशाली आणि तेजस्वी डोळ्यांसाठी ओळखले जातात. असे म्हटले जाते की त्यांचे भक्त भगवान व्यंकटेश्वराच्या डोळ्यांकडे थेट पाहू शकत नाहीत, कारण त्यांचे डोळे वैश्विक उर्जेच्या पलीकडे आहेत.
advertisement
4/5
या कारणामुळे त्यांचे डोळे मास्कने झाकलेले आहेत. मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे डोळे पंच कापूरने झाकलेले आहेत. फक्त गुरुवारीच व्यंकटेश्वराच्या डोळ्यावरील पांढरा मास्क बदलला जातो. त्यावेळी भक्तांना क्षणभर भगवान व्यंकटेश्वराच्या डोळ्यांचे दर्शन घडते.
advertisement
5/5
आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी, भगवान व्यंकटेश्वराला चंदनाने स्नान घालतात आणि नंतर त्यांच्या मूर्तीवर चंदनाची पेस्ट लावली जाते. असे म्हणतात की त्यांच्या हृदयावर चंदनाची पेस्ट लावल्याने लक्ष्मीची प्रतिमा दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Tirupati Balaji Temple : का बंद असतात तिरुपति बालाजीच्या मुर्तीचे डोळे? 99 टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट